शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

रांजणगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 19:24 IST

वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने हे अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने हे अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

रांजणगावातून जोगेश्वरी व कमळापूरकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर फळ-भाजीपाला विक्रेते व हातगाडीवाले व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय सुरु केला आहे. जोगेश्वरी रस्ता तर व्यवसायिकांनी व्यापला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. रहदारीचे हे मुख्य रस्ते असल्याने या रस्त्यावर कामगारासह नागरिकांची वर्दळ असते. तसेच ग्रामपंचायत कार्यालयही याच रस्त्यावर आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त नागरिकांची दिवसभर ये-जा असते. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने कायम वाहतूकीचा खोळंबा होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना घडत असून, वाहनधारकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा-अर्धा तास ताटकळावे लागत आहे. सायंकाळच्या वेळी तर रस्ता पूर्ण जाम होत असल्याने पादचाºयांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मध्यंतरी स्थानिक ग्रामपंचायतीने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील अतिक्रमण हटविले होते. पण ग्रामपंचायतीची मोहीम थंडावताच रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाले. वाढत्या अतिक्रमणामुळे जोगेश्वरी व कमळापूर रस्त्यावर ये-जा करणे अवघड झाले आहे. वाहनधारकांना तर वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेवून अतिक्रमणा विरोधात मोहिम राबवावी. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा. अशी मागणी या परिसरातील त्रस्त नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी