शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांचा खिसा रिकामा, मनमानी भाडे वसुली रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 14:14 IST

मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात यावे, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामा करीत आहेत.

मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात अर्धनग्न आंदोलन केले. तसेच जागरण- गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहित आंदोलनात सहभागी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित कायद्याप्रमाणे वेतन देऊ नये, अशी मागणी केली. सिडको बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी मुंडण करीत जागरण-गोंधळ घातला. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांकडून अवाचे सवा पैसे आकारण्यात येत होते. प्रवासी नेण्यावरून खासगी वाहतूकदारांमध्ये वादही होत होते; परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणीही नव्हते.

खासगी वाहतूकदारांना एसटी कर्मचाऱ्यांचा विरोधबसस्थानकात खासगी वाहने आणून प्रवासी वाहतूक करण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याबरोबर त्यांच्याकडून एसटीपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहनसर्व प्रकारच्या खासगी बस, स्कूलबस, कंपनीच्या बसेस, मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसेसची वाट न पाहता तसेच बसस्थानकावर गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणाहून या वाहनांतून प्रवास करावा आणि आपली गैरसोय टाळावी. प्रवासादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन