शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कपातीच्या रकमेबाबत कर्मचार्‍यांची बेजबाबदारी

By admin | Updated: May 24, 2014 00:48 IST

हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत

हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत कपात केल्या जाणार्‍या रकमेबाबत पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांकडून बेजबाबदारीने काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कपात केलेली रक्कम ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणार्‍या शिक्षक व इतर कर्मचार्‍यांची दरमहा भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, विविध बँका, पतसंस्था यांचे कर्जाचे हफ्ते याबाबतची रक्कम संंबंधित पंचायत समितीकडून कपात केली जाते. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील पंचायत समित्यांमध्ये याबाबतचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍याकडून केल्या जात असलेल्या दिरंगाईचा फटका संबंधित शिक्षक व कर्मचार्‍यांना बसत आहे. पंचायत समितीच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचार्‍यांची दरमहा कपातीची रक्कम त्यांच्या वेतनातून नियमितपणे कपात केली जाते. ही रक्कम तातडीने कपात केलेल्या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीत, बँका, पतसंस्थेच्या कर्जामध्ये तसेच एलआयसीचे हफ्ते भरण्याकरिता जमा होणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीत एका महिन्यात कपात केलेली रक्कम जवळपास ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उदाहरणच सांगायचे असेल तर जानेवारीमध्ये कपात झालेली रक्कम थेट मे महिन्यात संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. खात्यावर उशिरा रक्कम जमा होत असल्याने संबंधितांना नाहक दंड सोसावा लागतो. शिवाय त्यांना ३ महिन्यांच्या व्याजालाही मुकावे लागते. त्यामुळे दिरंगाईने जमा केलेली रक्कम ३ महिने जाते तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता कपातीचे धनादेश व कपातपत्रक हे पंचायत समिती स्तरावरून वेळेवर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. पंचायत समितीकडे याबाबत विचारणा केली असता, संबंधितांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. पं.स.मध्ये या विभागाचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍याच्या बेजबाबदारपणाचा फटका मात्र संबंधित शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. याबाबत महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी पं.स.कडे अनेकवेळा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)