शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

‘त्या’ कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांकडे

By admin | Updated: April 30, 2017 23:42 IST

बीड :५३ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन जि.प. ने अपंग कल्याण आयुक्तांना अहवाल पाठविला आहे. मात्र, अद्याप यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.

बीड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या मतिमंद, अपंग शाळांमध्ये आयुक्तांच्या संमतीशिवाय पदभरती केल्याचे समोर आले होते. तब्बल ५३ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन जि.प. ने अपंग कल्याण आयुक्तांना अहवाल पाठविला आहे. मात्र, अद्याप यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.२००४ मधील शासन आदेशानुसार अपंग संस्थांमध्ये पदभरती करण्यापूर्वी अपंग कल्याण आयुक्तांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले होते. मात्र, संस्थांनी जि.प. च्या तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यांना हाताशी धरुन परस्पर नियुक्ती आदेश मिळविले. तब्बल ५३ कर्मचाऱ्यांनी अश नियुक्त्या मिळविल्याचे पुढे आले होते. विशेष म्हणजे यापैकी काही कर्मचारी १२ वर्षांपासून सेवेत कार्यरत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचने हे प्रकरण लावून धरल्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र तुरूकमारे यांनी कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. तब्बल आठ दिवस समाजकल्याण कार्यालयामध्ये तपासणी मोहीम सुरू होती. त्याचा अहवाल समाजकल्याण अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांना आठ दिवसांपूर्वीच पाठविला आहे. मात्र, आयुक्तांकडून यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याबाबत आयुक्त पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. (प्रतिनिधी)