शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना

By विजय सरवदे | Updated: February 6, 2024 19:55 IST

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना !

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील ‘लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या मुख्यालयातील सर्वच विभागांत हजेरीसाठी ‘ग्रामीण ॲप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतात; पण अनेकदा ते टेबलावर दिसतच नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडे ताटकळत बसण्याशिवाय तरणोपाय नसतो.

अलीकडे, सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्या मिळत आहेत. कार्यालयीन कामांचा निपटारा करण्यासाठी अगोदर ५:३० वाजता सुटणारे कार्यालय आता सायंकाळी ६:२० पर्यंत चालते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालतो का, जि.प. समाज कल्याण विभागात याचे निरीक्षण सोमवारी सकाळी ९:५० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत करण्यात आले. तेव्हा अधिकारी- कर्मचारी १० वाजेच्या आत कार्यालयात पोहोच झाले. प्रत्येक जण आपापल्या टेबलवर जाऊन नियमित कामकाज करताना दिसून आले; पण तासाभरातच काही जण मोबाइलवर बोलत बाहेर रेंगाळताना दिसून आले, तर काही जण चहापानासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात चार- पाच सामाजिक कार्यकर्ते दलित सुधार योजनेबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र, योजनेचा आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच पडली. अन्य दोघे जण उपकरातील योजनांच्या यादीतील नावांबाबत खातरजमा करण्यासाठी आले होते.

वेळ ९:४५ ची, १०:१० पर्यंत येणे सुरूचपाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजेची आहे. मात्र, अनेक जण धावतपळत १०:१० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचताना दिसून आले.

चार-चार चकरा मारूनही काम होईनासरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आम्हाला आला. अनु. जाती व नवबौद्ध वस्ती विकासाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नेमके घोडे कुठे आडले, हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, यासंबंधीचा आराखडाच अजून अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले.- दामूअण्णा कांबळे

कर्मचारी कामावर नाही, असे होत नाही‘ग्रामीण ॲप’मुळे सर्वांनाच आता वेळेत यावे लागते. जो उशिरा येईल, त्याची आपोआप अर्ध्या दिवसाची हजेरी लागते. कोणी टेबलवर दिसत नाही, याचा अर्थ कर्मचारी कामावर नाही, असा होत नाही. वरिष्ठांना कामांची माहिती देण्यासाठी कर्मचारी मोबाइलवर बोलतात. अनेकदा कार्यालयात मोबाइलची रेंज येत नाही, यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर यावे लागते.- डॉ. ओपप्रकाश रामावत, प्रभारी समाजकल्याण अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद