शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना

By विजय सरवदे | Updated: February 6, 2024 19:55 IST

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना !

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील ‘लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या मुख्यालयातील सर्वच विभागांत हजेरीसाठी ‘ग्रामीण ॲप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतात; पण अनेकदा ते टेबलावर दिसतच नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडे ताटकळत बसण्याशिवाय तरणोपाय नसतो.

अलीकडे, सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्या मिळत आहेत. कार्यालयीन कामांचा निपटारा करण्यासाठी अगोदर ५:३० वाजता सुटणारे कार्यालय आता सायंकाळी ६:२० पर्यंत चालते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालतो का, जि.प. समाज कल्याण विभागात याचे निरीक्षण सोमवारी सकाळी ९:५० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत करण्यात आले. तेव्हा अधिकारी- कर्मचारी १० वाजेच्या आत कार्यालयात पोहोच झाले. प्रत्येक जण आपापल्या टेबलवर जाऊन नियमित कामकाज करताना दिसून आले; पण तासाभरातच काही जण मोबाइलवर बोलत बाहेर रेंगाळताना दिसून आले, तर काही जण चहापानासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात चार- पाच सामाजिक कार्यकर्ते दलित सुधार योजनेबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र, योजनेचा आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच पडली. अन्य दोघे जण उपकरातील योजनांच्या यादीतील नावांबाबत खातरजमा करण्यासाठी आले होते.

वेळ ९:४५ ची, १०:१० पर्यंत येणे सुरूचपाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजेची आहे. मात्र, अनेक जण धावतपळत १०:१० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचताना दिसून आले.

चार-चार चकरा मारूनही काम होईनासरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आम्हाला आला. अनु. जाती व नवबौद्ध वस्ती विकासाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नेमके घोडे कुठे आडले, हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, यासंबंधीचा आराखडाच अजून अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले.- दामूअण्णा कांबळे

कर्मचारी कामावर नाही, असे होत नाही‘ग्रामीण ॲप’मुळे सर्वांनाच आता वेळेत यावे लागते. जो उशिरा येईल, त्याची आपोआप अर्ध्या दिवसाची हजेरी लागते. कोणी टेबलवर दिसत नाही, याचा अर्थ कर्मचारी कामावर नाही, असा होत नाही. वरिष्ठांना कामांची माहिती देण्यासाठी कर्मचारी मोबाइलवर बोलतात. अनेकदा कार्यालयात मोबाइलची रेंज येत नाही, यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर यावे लागते.- डॉ. ओपप्रकाश रामावत, प्रभारी समाजकल्याण अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद