शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना

By विजय सरवदे | Updated: February 6, 2024 19:55 IST

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना !

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील ‘लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या मुख्यालयातील सर्वच विभागांत हजेरीसाठी ‘ग्रामीण ॲप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतात; पण अनेकदा ते टेबलावर दिसतच नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडे ताटकळत बसण्याशिवाय तरणोपाय नसतो.

अलीकडे, सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्या मिळत आहेत. कार्यालयीन कामांचा निपटारा करण्यासाठी अगोदर ५:३० वाजता सुटणारे कार्यालय आता सायंकाळी ६:२० पर्यंत चालते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालतो का, जि.प. समाज कल्याण विभागात याचे निरीक्षण सोमवारी सकाळी ९:५० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत करण्यात आले. तेव्हा अधिकारी- कर्मचारी १० वाजेच्या आत कार्यालयात पोहोच झाले. प्रत्येक जण आपापल्या टेबलवर जाऊन नियमित कामकाज करताना दिसून आले; पण तासाभरातच काही जण मोबाइलवर बोलत बाहेर रेंगाळताना दिसून आले, तर काही जण चहापानासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात चार- पाच सामाजिक कार्यकर्ते दलित सुधार योजनेबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र, योजनेचा आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच पडली. अन्य दोघे जण उपकरातील योजनांच्या यादीतील नावांबाबत खातरजमा करण्यासाठी आले होते.

वेळ ९:४५ ची, १०:१० पर्यंत येणे सुरूचपाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजेची आहे. मात्र, अनेक जण धावतपळत १०:१० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचताना दिसून आले.

चार-चार चकरा मारूनही काम होईनासरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आम्हाला आला. अनु. जाती व नवबौद्ध वस्ती विकासाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नेमके घोडे कुठे आडले, हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, यासंबंधीचा आराखडाच अजून अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले.- दामूअण्णा कांबळे

कर्मचारी कामावर नाही, असे होत नाही‘ग्रामीण ॲप’मुळे सर्वांनाच आता वेळेत यावे लागते. जो उशिरा येईल, त्याची आपोआप अर्ध्या दिवसाची हजेरी लागते. कोणी टेबलवर दिसत नाही, याचा अर्थ कर्मचारी कामावर नाही, असा होत नाही. वरिष्ठांना कामांची माहिती देण्यासाठी कर्मचारी मोबाइलवर बोलतात. अनेकदा कार्यालयात मोबाइलची रेंज येत नाही, यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर यावे लागते.- डॉ. ओपप्रकाश रामावत, प्रभारी समाजकल्याण अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद