शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आहेत ते उद्योग टिकवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:05 IST

कोरोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, हे सांगता येत नाही. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र बिघडले आहे. अलीकडे दुसऱ्या ...

कोरोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, हे सांगता येत नाही. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र बिघडले आहे. अलीकडे दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू होते. पण, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योगांची उत्पादने विकली गेली नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक उद्योगांना उत्पादन क्षमता कमी करावी लागली. यापुढेही या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे गृहीत धरून सध्यातरी आहेत ते उद्योग टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. उद्योगांचा विस्तार किंवा वाढीसाठी तर आमचे प्रयत्न आहेतच.

दुसरीकडे, औरंगाबादेत ‘डीएमआयसी’सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग आल्यास येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना उभारी येईल. ‘बजाज’सारख्या एकाच उद्योगावर येथे अनेक उद्योग कार्यरत आहेत. यापैकी काहींनी बाहेरच्या उद्योगांची व्हेंडरशिप घेतली; परंतु कोरोनामध्ये ऑर्डरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेक उद्योग डबघाईला आले. त्यामुळे येथे मोठे उद्योग आणण्यासाठी शासनाला मदत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

येथील उत्पादित मालाच्या निर्यातीला चालना देण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये आपल्या उद्योगांची जास्तीत जास्त ‘मार्केटिंग’ झाली पाहिजे. विविध देशांतील प्रदर्शनामध्ये उत्पादनांचे स्टॉल लावण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा उपयोग झाला पाहिजे. इंजिनिअरिंग उत्पादनासाठी दोन वर्षांपूर्वी ‘इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ (ईएपीसी) ही संस्था सुरू केलेली आहे. अशाप्रकारे अन्य उत्पादन क्षेत्रात मार्केटिंग करणाऱ्या अशासकीय संस्थांना पाठबळ देण्याचे काम ‘सीएमआयए’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मराठवाड्यात अंबा, मोसंबी, डाळिंब तसेच अन्य शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना देण्याचाही आमचा विचार आहे. ‘सीएमआयए’ने उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून दोन वर्षांपासून ‘स्टाईव्ह’ प्रकल्पांतर्गत खासगी ‘आयटीआय’मध्ये बेरोजगार तरुण- तरुणींना प्रशिक्षण दिले जाते व त्यांना रोजगार दिला जातो.

मराठवाडा व विदर्भ या मागास भागातील उद्योगांना चालना मिळावी, यासाठी शासनाने विजेची सबसिडी सुरू केली होती. अलीकडे ती काढून घेण्यात आली आहे. ती पूर्ववत चालू ठेवावी, यासंदर्भात ‘सीएमआयए’च्या वतीने आमचा पाठपुरावा करणार आहोत.

- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, सीएमआयए