शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

नळाद्वारे पाणी देण्याच्या मागणीला जोर

By admin | Updated: April 25, 2016 00:39 IST

लातूर : लातूर शहरात सध्या सुरू असलेले टँकरचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप होत नाही. ठराविक भागांतच पाणी दिले जात असून,

लातूर : लातूर शहरात सध्या सुरू असलेले टँकरचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप होत नाही. ठराविक भागांतच पाणी दिले जात असून, सर्वसामान्य जनता मात्र पाणीटंचाईने आजही होरपळत आहे. समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी महापालिकेने नळाद्वारेच पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नळाद्वारे पाणी देण्याची आयुक्तांकडे मागणी केल्यानंतर लागलीच भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन नळाद्वारे पाण्याचा आग्रह केला आहे.लातूर शहराला विविध ठिकाणाहून पाणी येत आहे़ त्यामुळे सर्वांना पाणी मिळत नाही़ शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहेचविण्यासाठी महानगरपालिकेने नळाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे़ निवेदनावर राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे, नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे, स्रेहलता अग्रवाल, इर्शाद तांबोळी, दीपाली इंद्राळे, विनोद रणसुभे, राहुल माकणीकर, कौसरबी सय्यद, प्रशांत पाटील, इब्राहिम सय्यद, शारदा बनसोडे, मुक्तार शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने विशेष बाब म्हणून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र उपलब्ध होणारे पाणी मनपाच्या वतीने वितरीत होत असल्याने अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस नळाद्वारेच पाणी द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हा शाखेने आयुक्तांकडे केली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, अ‍ॅड. प्रदीप मोरे, गणेश हेड्डा, राजकुमार परदेशी, सुनील मलवाड, प्रशांत राचट्टे, सतीश ठाकूर, प्रवीण येळे, प्रकाश सोनवणे, संतोष पांचाळ, गणेश कलमे, पप्पू भालेराव, अ‍ॅड. ललित तोष्णीवाल, उमेश नागरगोजे आदींची उपस्थिती होती. लातूर महापालिकेला उपलब्ध होणारे पाणी योग्यप्रकारे वितरीत करता येत नाही. तसेच उपलब्ध होणारे पाणी व वितरीत होणारे पाणी यात कसलाही ताळमेळ नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. महापालिकेने आठवड्यातून एकवेळा नळाद्वारे पाणी दिले पाहिजे. शासनाच्या पैशाचा व पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप भाजपाच्या शहर जिल्हा शाखेने केला आहे. तर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबु खंदाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन पाणी वाटपासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, मनपाच्या यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे शासनानेच नियोजन हाती घ्यावे, अशी मागणी केली. शिवाय, राज्य शासनाने दिलेल्या पाण्याचे श्रेय भाजपा सरकारला मिळू नये, यासाठी मनपा राजकीय खेळी खेळत असल्याचा आरोपही खंदाडे यांनी केला.शहरातील प्रभाग क्र. १७ मध्ये मनपाच्या टँकरसोबत खाजगी लोक पाणी वितरीत करीत आहेत. त्यामुळे तोंड बघून पाणी दिले जात आहे. सर्वांना समान पाणी मिळत नाही. महापालिकेने तात्काळ कर्मचाऱ्यांची टँकरवर नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अयुब मणियार, गणपती केंद्रे, फेरोज पठाण, दिलीप भांडेकर यांनी केली आहे. प्रकाश नगर, गिरवलकर नगर, कपिल नगर, विकास नगर, राम-रहीम नगर, मुस्तफा कॉलनी, आनंद नगर, अंजली नगर, शाम नगर आदी भागांत पाणी मिळत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. याशिवाय, शहराच्या रिंग रोड लगत असलेल्या भागांमध्ये पाणी वितरणात विस्कळीतपणा आहे. नगरसेवकांच्या हाती यंत्रणा असल्याने ठराविक भागातच पाण्याचा पूर आहे. रेल्वेने पाणी येत असल्याने आता लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महापालिकेने टँकरऐवजी नळाद्वारे पाणी दिल्यास अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महापालिकेकडून टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. ठराविक भागांतच पाणी जात असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. मनपा दप्तरी प्रत्येक टँकरवर कर्मचारी नियुक्त केल्याची नोंद आहे. परंतु, अनेक प्रभागांत कर्मचारी पाणी वाटपाच्या कामात नाहीत. त्यामुळे नगरसेवक किंवा त्यांचे कार्यकर्ते पाणी वाटप करीत आहेत. राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांतून केला जात आहे. (प्रतिनिधी)