शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:18 IST

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देनियोजन : दोन वर्षांच्या गोंधळानंतर यावर्षी सुरळीत पार पडण्याची आशा

औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.शासनाने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह औरंगाबाद शहरातील महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होत आहेत. मात्र, दोन्ही वर्षी ही प्रवेश प्रक्रिया गोंधळाची राहिली आहे. यात नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना योग्य माहिती आणि नियोजित वेळेत प्रवेश प्रक्रिया होत नसल्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील जागा रिक्त राहिल्याचा प्रकार दोन्ही वर्षी घडला आहे. यामुळे येत्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित कार्यपद्धती अवलंबिण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली कॉलेज प्रपत्रामधील शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित, कायम विनाअनुदानित, वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी महाविद्यालयाने नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक यांनी निश्चित केलेल्या आॅनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सोमवारपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सुरुवातीस अर्ज भाग-१ भरता येणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अर्ज भाग-२ भरता येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय