शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:18 IST

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देनियोजन : दोन वर्षांच्या गोंधळानंतर यावर्षी सुरळीत पार पडण्याची आशा

औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.शासनाने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह औरंगाबाद शहरातील महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होत आहेत. मात्र, दोन्ही वर्षी ही प्रवेश प्रक्रिया गोंधळाची राहिली आहे. यात नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना योग्य माहिती आणि नियोजित वेळेत प्रवेश प्रक्रिया होत नसल्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील जागा रिक्त राहिल्याचा प्रकार दोन्ही वर्षी घडला आहे. यामुळे येत्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित कार्यपद्धती अवलंबिण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली कॉलेज प्रपत्रामधील शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित, कायम विनाअनुदानित, वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी महाविद्यालयाने नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक यांनी निश्चित केलेल्या आॅनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सोमवारपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सुरुवातीस अर्ज भाग-१ भरता येणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अर्ज भाग-२ भरता येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय