शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकी देतो,भरतो!

By admin | Updated: April 4, 2017 23:16 IST

बीड : महावितरणकडून मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेला ग्राहकांचा थंडा प्रतिसाद लाभल्याने मंडळ उद्दिष्टापासून वंचित राहिले आहे.

बीड : महावितरणकडून मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेला ग्राहकांचा थंडा प्रतिसाद लाभल्याने मंडळ उद्दिष्टापासून वंचित राहिले आहे. मात्र महिनाभरात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी अविरत प्रयत्न करीत ३२ कोटींचा आकडा गाठला आहे. गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचा आकडा वाढला आहे.वाढत्या थकबाकीमुळे यंदा विभागाला उच्च दाब, लघू दाब वाहिनीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय कार्यालयांना वसुलीचा आराखडा येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून ठरवून देण्यात आला होता. महिनाभरापासून महावितरणच्या अभियंत्यांसह वायरमन दिवस उजाडताच वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी जात होते. बीड विभागातून १३ कोटी ८४ लाख तर अंबाजोगाई विभागातील लघू दाब वाहिनीवरील ग्राहकांकडून ११ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. विभागात सर्वाधिक थकबाकी अंबाजोगाई तालुक्याकडे असली तरी यंदा केज उपविभागीय कार्यालयांतर्गत अधिकच वसुली झाली असल्याचे कार्यकारी अभियंता मंदार वैंग्यानी यांनी सांगितले.बीड विभागात बीड अर्बनने ६ कोटी, ग्रामीणमधून २ कोटी, गेवराई उपविभाग कार्यालयांतर्गत २ कोटी अशी वसुली झाली आहे. शहरी भागातून वसुलीकरीता प्रतिसाद मिळाला असला तरी ग्रामीण भागातील ग्राहकांनी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके म्हणाले.गेवराईतून ‘शॉक’महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाणीपासून ते वीजपुरवठ्यापर्यंतच्या तक्रारी गेवराई उपविभागीय कार्यालयांतर्गत वाढत आहेत. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गाऱ्हाणे करणाऱ्या या तालुक्यातून सरासरी एवढीही वसुली झाली नाही. एकूण वसुलीच्या केवळ १४ टक्के भार या तालुक्याने उचलला असून, बीड विभागात सर्वाधिक थकबाकी गेवराई उपविभागाकडे असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)