शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भारनियमन नसतानाही रोजच होते वीज गुल

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे.

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे. याची पूर्वकल्पना शहरवासीयांना दिली जात नाही. परिणामी, दुपारच्या वेळी अचानक वीज गुल झाल्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत. मान्सूनपूर्व कामे करा; पण त्याची पूर्वसूचना शहरवासीयांना द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या उलट गारखेडा, बीड बायपास, सातारा, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात दररोज वीज गुल होत असल्याने छुपे भारनियमन सुरू केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा व बिल वसुलीची जबाबदारी जीटीएलवर सोपविली. मात्र, शहरात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात जीटीएलला अपयश आले आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सर्रासपणे शहरात भारनियमन केले जात आहे. दर शुक्रवारी सक्तीने भारनियमन केले जातच आहे. याशिवाय अन्य दिवसांतही शहरातील वेगवेगळ्या भागांतील लाईट दोन ते चार तासांपर्यंत गायब करण्यात येत आहे. औरंगपुर्‍यातील महेंद्र गजभय्ये यांनी सांगितले की, दुकानातील लाईट कधी गायब होईल याचा नेम नाही. जेव्हा लाईट जाते तेव्हा आम्ही जीटीएलच्या तक्रार केंद्रावर फोन करतो; पण कोणीच दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जवाहर कॉलनीतील अशोक रंजलकर यांनी सांगितले की, दर दोन ते तीन दिवसांआड आमच्या परिसरातील लाईट दिवसा बंद केली जाते. डीपीची पाहणी केली तर तिथे कोणतेही काम सुरू नसते. परिसरात फिरून पाहिले तर जीटीएलचा कोणीच कर्मचारी विद्युत खांबावर काम करताना आढळून येत नाही. मग लाईट कशासाठी बंद केली जाते हेच कळत नाही. सातारा परिसरातील द्वारकादास जाधव या रहिवाशाने प्रश्न केला की, जीटीएलला भारनियमन करण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही नियमित वीज बिल भरत असताना आम्हाला भारनियमनाची शिक्षा का? असेच प्रश्न शिवाजीनगर, पुंडलिकनगरातील नागरिकांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरात भारनियमन करायचे नाही, असे राज्य शासनाचे धोरण आहे. हा नियम राज्यभर लागू होतो. शहरात वीज गळती व थकबाकीचे प्रमाण वाढल्याने येथे भारनियमन करण्यात यावे, असे पत्र जीटीएलने महावितरणाला पाठविले आहे. औरंगाबादेत भारनियमन करताच येत नाही. जे प्रामाणिकपणे बिल भरतात त्यांना छुप्या भारनियमनाचा फटका बसत आहे, मान्सूनपूर्वीची कामे करावीत; पण त्याविषयी माहिती देणे हे जीटीएलचे काम आहे. -हेमंत कापडिया, प्रतिनिधी, वीज नियामक आयोगशहरातील काही भागात १८ ते ३० टक्क्यांपर्यंत वीज गळती होत आहे व काही भागात ४२ ते ४५ टक्क्यांपर्यंत थकबाकी पोहोचली आहे. शहरात १६९ फिडर आहेत. त्यापैकी ८८ फिडरवर भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी जीटीएलने महावितरणाकडे केली आहे. वीज गळती रोखणे व थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागणारच आहेत. -समीर पाठक, पीआरओ, जीटीएल