शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन नसतानाही रोजच होते वीज गुल

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे.

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे. याची पूर्वकल्पना शहरवासीयांना दिली जात नाही. परिणामी, दुपारच्या वेळी अचानक वीज गुल झाल्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत. मान्सूनपूर्व कामे करा; पण त्याची पूर्वसूचना शहरवासीयांना द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या उलट गारखेडा, बीड बायपास, सातारा, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात दररोज वीज गुल होत असल्याने छुपे भारनियमन सुरू केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा व बिल वसुलीची जबाबदारी जीटीएलवर सोपविली. मात्र, शहरात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात जीटीएलला अपयश आले आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सर्रासपणे शहरात भारनियमन केले जात आहे. दर शुक्रवारी सक्तीने भारनियमन केले जातच आहे. याशिवाय अन्य दिवसांतही शहरातील वेगवेगळ्या भागांतील लाईट दोन ते चार तासांपर्यंत गायब करण्यात येत आहे. औरंगपुर्‍यातील महेंद्र गजभय्ये यांनी सांगितले की, दुकानातील लाईट कधी गायब होईल याचा नेम नाही. जेव्हा लाईट जाते तेव्हा आम्ही जीटीएलच्या तक्रार केंद्रावर फोन करतो; पण कोणीच दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जवाहर कॉलनीतील अशोक रंजलकर यांनी सांगितले की, दर दोन ते तीन दिवसांआड आमच्या परिसरातील लाईट दिवसा बंद केली जाते. डीपीची पाहणी केली तर तिथे कोणतेही काम सुरू नसते. परिसरात फिरून पाहिले तर जीटीएलचा कोणीच कर्मचारी विद्युत खांबावर काम करताना आढळून येत नाही. मग लाईट कशासाठी बंद केली जाते हेच कळत नाही. सातारा परिसरातील द्वारकादास जाधव या रहिवाशाने प्रश्न केला की, जीटीएलला भारनियमन करण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही नियमित वीज बिल भरत असताना आम्हाला भारनियमनाची शिक्षा का? असेच प्रश्न शिवाजीनगर, पुंडलिकनगरातील नागरिकांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरात भारनियमन करायचे नाही, असे राज्य शासनाचे धोरण आहे. हा नियम राज्यभर लागू होतो. शहरात वीज गळती व थकबाकीचे प्रमाण वाढल्याने येथे भारनियमन करण्यात यावे, असे पत्र जीटीएलने महावितरणाला पाठविले आहे. औरंगाबादेत भारनियमन करताच येत नाही. जे प्रामाणिकपणे बिल भरतात त्यांना छुप्या भारनियमनाचा फटका बसत आहे, मान्सूनपूर्वीची कामे करावीत; पण त्याविषयी माहिती देणे हे जीटीएलचे काम आहे. -हेमंत कापडिया, प्रतिनिधी, वीज नियामक आयोगशहरातील काही भागात १८ ते ३० टक्क्यांपर्यंत वीज गळती होत आहे व काही भागात ४२ ते ४५ टक्क्यांपर्यंत थकबाकी पोहोचली आहे. शहरात १६९ फिडर आहेत. त्यापैकी ८८ फिडरवर भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी जीटीएलने महावितरणाकडे केली आहे. वीज गळती रोखणे व थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागणारच आहेत. -समीर पाठक, पीआरओ, जीटीएल