शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात विजेची उधळपट्टी !

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जास्तीत जास्त तीन बल्ब, टीव्ही व एखादा पंखा वापरणाऱ्या कुटुंबालाही पाचशे ते हजार रुपयापर्यंत वीज बिल आकारले जात आहे. कमी विजेचा वापर असूनही जास्त वीज बिल आकारले जात असतानाच शासकीय कार्यालयात मात्र दिवसाढवळ्या ट्युब लाईट, पंखे सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद आघाडीवर आहेत. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयेही काही यात मागे नव्हती. येथील बहुतांश कार्यालयात कर्मचारी नसताना विजेची उपकरणे आणि बल्ब सुरू हाते. अशा उधळपट्टी कुठेतरी चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.शासनाची मालमत्ता म्हणून बेफिकिरीने वापण्याची पवृत्ती अनेक शासकीय कार्यालयात सर्रास सुरु आहे. ‘दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान..स्वत: मात्र कोरडा पाषाण’ अशी स्थिती प्रशासनाच्या काही कार्यालयांची झाली आहे. नागरिकांना नियमांचे सल्ले द्यायचे आणि स्वत: मात्र कसलीही बंधने, कसलेही नियम पाळायचे नाहीत. शनिवारी महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू होते. मात्र याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दालनातील टयुब, पंखे व संगणक सुरुच होते. कार्यालयात कोणीही नसतानाही मोठ्या प्रमाणावर वीज वाया जात असल्याचे भान कोणालाही नसल्याचे दिसून आले.त्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने अन्य काही कार्यालयात जावून पाहिले असता तेथेही असाच प्रकार नजरेस आला. अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यालयात नव्हते, मात्र विजेवर चालणारी उपकरणे सुरूच होती. विशेष म्हणजेच येथे काही कर्मचारी उपस्थित असतानाही त्यांनी विनावश्यक उपकरणे बंद केली नाहीत. त्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. पोर्चमध्येच वीज बचतीचा सल्ला देणारा फलक दिसून येतो. परंतु, फलक केवळ भिंतीपुरताच मर्यादत राहिल्याचे विविध विभागात जावून पाहिल्यानंतर लक्षात आले. दुपारच्यावेळी शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम या विभागातील कर्मचारी जेवणासाठी गेले होते. बल्ब, पंखे आणि काही टेबलावरील संगणकही सुरूच होते. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शिपाई खुर्चि टाकून ऐटित बसले होते. त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या दालनातील पंखे आणि बल्बही सुरू होते. मात्र, त्या महाशयांचे त्याकडे लक्ष गेले नाही, हे विशेष.कार्यालयात कोणीही नसल्यानंतर बल्ब, पंखे बंद का करीत नाहीत, असा सवाल केला असता, ‘साहेब, अधिकाऱ्यांना आणि टेबल प्रमुखांना वारंवार सांगितले जाते. परंतु, ते त्याकडे लक्ष देत नाहीत. आम्ही तरी किती दिवस उपकरणे बंद करणार? असा उलट प्रश्न त्याने केला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी विजेच्या बचतीबाबत किती गंभीर आहेत, हेच यातून समोर येत आहे. त्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने जिल्हा मध्यवर्ती इमारत गाठली असता येथेही अत्यंत गंभीर चित्र नजरेस पडले. अनेक कार्यालयामध्ये गजर नसताना बल्ब, टयुब सुरू होत्या. संगणकही बंद करण्यात आले नव्हते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारणारे कोणी आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने कोणालाही पडल्यावाचून राहणार नाही. (प्रतिनिधी)एकीकडे शेतकरी पुरेशी वीज द्या, अशी ओर करीत आहेत. पैसे मोजूनही त्यांना वेळेवर पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. अनेकवेळा विहिरीमध्ये पाणी असूनही केवळ वीजेअभावी कोळी पिके करपताना पाहण्याची वेळ या बळीराजावर येते. असे असतानाच दुसरीकडे मात्र विजेचा प्रचंड अपव्यय होत आहे. अशा प्रकाराला कुठेतरी आळा बसण्याची नितांत गरज आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.