शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

१६ हजारांपैकी अवघ्या ९१ शेतकऱ्यांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:15 IST

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची तत्परता : उच्चदाब वीज वितरण प्रणालीची दीड वर्षातील कामगिरी

औरंगाबाद : कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.यासंदर्भात महावितरणने कळविले आहे की, उच्चदाब प्रणालीअंतर्गत राज्यातील २ लाख २४ हजार शेतकरी, तर औरंगाबाद परिमंडळात १६ हजार १८५ शेतकºयांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६ हजार १०१, तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यासाठी ज्या शेतकºयांना अडीच लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.औरंगाबाद परिमंडळात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्यासाठी कंत्राटदारांना जवळपास ३०६ कोटींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १०, १६ व २५ केव्हीए क्षमतेची १४ हजार ५२८ रोहित्रे लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी साहित्याची पूर्वतयारी करणे, अशा काही तांत्रिक अडचणींमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विलंब होत आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. येत्या काही दिवसांत या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून, या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.चौकट....४५ कंत्राटदारांमार्फत सुरू आहेत कामेया योजनेंतर्गत परिमंडळात औरंगाबाद जिल्ह्यातील ३५ व जालना जिल्ह्यातील ५६ शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सध्या रोहित्रांची चांगल्या प्रमाणात उपलब्धता होत असल्याने कामांनी वेग घेतला आहे. परिमंडळात जवळपास ४५ कंत्राटदारांमार्फत ही कामे केली जात असून, कामाच्या प्रगतीसाठी कंत्राटदारांच्या नियमित बैठका घेण्यात येत आहेत. कंत्राटदारांना निविदानिहाय प्रत्येक महिन्यास २० रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा अनामत रक्कम न भरणाºया तीन कंत्राटदारांचे कार्यादेश महावितरणने रद्द केले आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजmahavitaranमहावितरण