शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजारांपैकी अवघ्या ९१ शेतकऱ्यांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:15 IST

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची तत्परता : उच्चदाब वीज वितरण प्रणालीची दीड वर्षातील कामगिरी

औरंगाबाद : कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे.यासंदर्भात महावितरणने कळविले आहे की, उच्चदाब प्रणालीअंतर्गत राज्यातील २ लाख २४ हजार शेतकरी, तर औरंगाबाद परिमंडळात १६ हजार १८५ शेतकºयांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६ हजार १०१, तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यासाठी ज्या शेतकºयांना अडीच लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.औरंगाबाद परिमंडळात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्यासाठी कंत्राटदारांना जवळपास ३०६ कोटींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १०, १६ व २५ केव्हीए क्षमतेची १४ हजार ५२८ रोहित्रे लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी साहित्याची पूर्वतयारी करणे, अशा काही तांत्रिक अडचणींमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विलंब होत आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. येत्या काही दिवसांत या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून, या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.चौकट....४५ कंत्राटदारांमार्फत सुरू आहेत कामेया योजनेंतर्गत परिमंडळात औरंगाबाद जिल्ह्यातील ३५ व जालना जिल्ह्यातील ५६ शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सध्या रोहित्रांची चांगल्या प्रमाणात उपलब्धता होत असल्याने कामांनी वेग घेतला आहे. परिमंडळात जवळपास ४५ कंत्राटदारांमार्फत ही कामे केली जात असून, कामाच्या प्रगतीसाठी कंत्राटदारांच्या नियमित बैठका घेण्यात येत आहेत. कंत्राटदारांना निविदानिहाय प्रत्येक महिन्यास २० रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा अनामत रक्कम न भरणाºया तीन कंत्राटदारांचे कार्यादेश महावितरणने रद्द केले आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजmahavitaranमहावितरण