शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

वीज कंपनीला ‘झटका’

By admin | Updated: March 23, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे.

उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये दण्याचे आदेश वीज कंपनीला दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकरी प्रकाश केरबा राऊत यांनी मुरूड शिवारातील जलस्त्रोतासाठी ७०५ एच.पी.ची वीजजोडणी देण्यात यावी, असा मागणी अर्ज वीज कंपनीकडे १७ फेब्रुवारी २००९ मध्ये सादर केला होता. त्यानंतर ३ मार्च २००९ रोजी कोटेशनचा भरणाही केला होता. परंतु, वीज कंपनीकडून काहीकेल्या कनेक्शन मिळाले नाही. वारंवार पाठपुरवा करूनही काहीच फायदा न झाल्यामुळे अखेर राऊत यांनी जिल्हा ग्राहक मंच लातून येथे तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यास विलंब केल्यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यास प्रतिदिन १ हजार रूपये दंड या प्रमाणे ४३२ दिवसांचे ४ लाख ३२ हजार रूपये देण्याचे आदेश दिले. परंतु, महावितरण कंपनीने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल केले. सदरील अपिलावर सुनावणी झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी हे प्रकरण निकाली काढत वीज कंपनीचे अपील फेटाळून संबंधित तक्रारदार शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये व्याजासह देण्याचे आदेश दिले, अशी माहिती अ‍ॅड. एन. बी. जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तक्रार निवारण आयोगाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)