शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीला ‘झटका’

By admin | Updated: March 23, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे.

उस्मानाबाद : तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकऱ्याने कनेक्शनसाठी पैसे भरले. परंतु, जोडणी मिळाली नाही. हा प्रकार वीज कंपनीच्या अंगाशी आला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये दण्याचे आदेश वीज कंपनीला दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतकरी प्रकाश केरबा राऊत यांनी मुरूड शिवारातील जलस्त्रोतासाठी ७०५ एच.पी.ची वीजजोडणी देण्यात यावी, असा मागणी अर्ज वीज कंपनीकडे १७ फेब्रुवारी २००९ मध्ये सादर केला होता. त्यानंतर ३ मार्च २००९ रोजी कोटेशनचा भरणाही केला होता. परंतु, वीज कंपनीकडून काहीकेल्या कनेक्शन मिळाले नाही. वारंवार पाठपुरवा करूनही काहीच फायदा न झाल्यामुळे अखेर राऊत यांनी जिल्हा ग्राहक मंच लातून येथे तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यास विलंब केल्यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यास प्रतिदिन १ हजार रूपये दंड या प्रमाणे ४३२ दिवसांचे ४ लाख ३२ हजार रूपये देण्याचे आदेश दिले. परंतु, महावितरण कंपनीने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल केले. सदरील अपिलावर सुनावणी झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी हे प्रकरण निकाली काढत वीज कंपनीचे अपील फेटाळून संबंधित तक्रारदार शेतकऱ्यास ४ लाख ३२ हजार रूपये व्याजासह देण्याचे आदेश दिले, अशी माहिती अ‍ॅड. एन. बी. जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तक्रार निवारण आयोगाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)