शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

विद्यार्थ्यांनी बनविले वीज निर्मिती करणारे यंत्र

By admin | Updated: June 14, 2016 23:57 IST

औरंगाबाद : विजेची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

औरंगाबाद : विजेची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासाठी निसर्गत:च मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या ‘हवा’ आणि ‘सूर्यप्रकाश’ या नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून त्यापासून वीजनिर्मिती करणारे यंत्र बनविण्याचा अनोखा प्रयोग एमआयटी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी केला आहे. बालाजी जगताप, अविनाश घोडके, स्वरूप देशमुख, पवनसिंह कच्छवे, विपुल कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला. हे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या यांत्रिकी शाखेत शेवटच्या वर्गात आहेत. याविषयी हे विद्यार्थी म्हणाले की, सर्वत्र विजेचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे हवा आणि सौर ऊर्जेचा वापर करून स्वस्तात वीज निर्मिती करणारे हे यंत्र बनविण्याचे ठरवले. या यंत्राचा वापर घर, कार्यालय, महाविद्यालये यासारख्या अनेक ठिकाणी करता येतो. घराच्या छतावर हे मॉडेल बसवता येते. यासाठी जागादेखील अत्यंत कमी लागते. या यंत्रासाठी एक हवेवर फिरणारे ब्लेड, सौर ऊर्जेचे पॅनल, वीज साठवण्यासाठी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.हवेमुळे ही ब्लेड कायम फिरते, त्यामुळे त्याच्या गतीपासून वीजनिर्मिती होते. तसेच सौरऊर्जेमुळेही वीज निर्मिती होते. हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना अत्यंत कमी खर्च आला. सध्या या यंत्राद्वारे सहा व्हॅटचा बल्ब अहोरात्र चालू शकतो. भविष्यात या यंत्रात सुधारणा करून आणि अजून नवीन तंत्रज्ञान वापरून एका घराला लागणारी वीज निर्मिती सहज होऊ शकते, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. त्यांना डॉ. प्रा. वि. बी. पानसरे, डॉ. प्रा. ए. टी. औटी आदींचे मार्गदर्शन लाभले. ‘प्रयोग माझा’ विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही असे काही नवीन प्रयोग, यंत्र तयार केले असतील, तर तुमच्या या प्रयोगांचे स्वागतच आहे. तुमच्या नवनवीन प्रयोगांना या सदरातून प्रसिद्धी दिली जाईल. यासाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे संपर्क साधावा.