शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

विजेच्या खांबाला दोरीचा आधार..!

By admin | Updated: June 10, 2014 00:54 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजयनगर भागात अंतर्गत विजेचा खांब मुळासकट तुटून दोन महिने झाले आहेत.

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजयनगर भागात अंतर्गत विजेचा खांब मुळासकट तुटून दोन महिने झाले आहेत. त्यावरुन गावाचा वीजपुरवठा चालू आहे. खांब दोरीने बांधून ठेवला असून, या धोकादायक विजेच्या खांबामुळे येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.२६ फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वाऱ्याने विजयनगर भागातील सिमेंट खांब मुळासकट मोडून विजेच्या तारावर उभा आहे. भर रस्त्यावर मोडलेला विजेचा खांब रहिवाशांनी दोर बांधून धरून ठेवला आहे. वादळी वाऱ्याने हा खांब घरावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यात वीजपुरवठा चालू असल्याने जीवित हानीचीही शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना खांबाची माहिती देऊनही तो खांब बदलला जात नाही. १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या धोकादायक खांबाजवळून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावे लागणार आहे. धोकादायक विजेच्या खांबामुळे येथील रहिवाशांचे जीवन धोकादायक बनले आहे. कधी खांब कुणावर कोसळेल याचा नेम नाही. तरी धोकादायक विजेचा खांब बदलून वीजपुरवठा चालू करावा, अशी मागणी विजय प्रताप युवा मंचचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे. अन्यथा येथील रहिवासी महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)