शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

वीज गळती ४५% वर

By admin | Updated: June 12, 2016 00:05 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद सदोष यंत्रणा आणि वीज चोरीमुळे महावितरण कंपनीची शहरातील वीज गळती लक्षणीयरीत्या वाढली आहे. वीज गळतीचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादसदोष यंत्रणा आणि वीज चोरीमुळे महावितरण कंपनीची शहरातील वीज गळती लक्षणीयरीत्या वाढली आहे. वीज गळतीचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कंपनीने वीज गळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील निम्म्या फिडरवर कंपनीच्या पथकांकडून तपासणी अभियान राबविले जात आहे. गळतीच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे संपूर्ण शहरावर लोडशेडिंगचे संकट येऊ शकते.शहरात महावितरण कंपनीचे ८६ फिडर आहेत. या सर्व फिडरवरील वीज ग्राहकांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार इतकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरुपाच्या ग्राहकांचा समावेश आहे.परंतु गेल्या काही दिवसांत शहरात वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आता तर ही वीज गळती विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २० ते २५ टक्के होते. मात्र आता ते ४५ टक्केझाले आहे. या गळतीत लाईन लॉसबरोबरच वीज चोरीचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी महावितरण कंपनीला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. जुन्या शहरातील काही फिडरवर ही गळती अगदी ६० टक्क्यांपर्यंत गेली आहे. जुन्या शहरात म्हणजे विभाग क्रमांक-१ मध्ये ५० फिडर आहेत. त्यातील २४ फिडरवर सर्वाधिक वीज चोरी आहे. त्याप्रमाणे विभाग क्रमांक-२ मध्येही ३६ पैकी १० फिडरवर वीज गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आजघडीला शहरात एकूण ४५ टक्के इतकी वीज गळती होत आहे. आतापर्यंतचा विचार करता वीज गळतीचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी थांबविण्यासाठी शहरात दहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक पाहणी करण्यात येत आहे. लोडशेडिंगचाही धोका...औरंगाबाद शहर सहा वर्षांपूर्वीच भारनियमनमुक्त घोषित करण्यात आलेले आहे; परंतु आता वीज गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे लोडशेडिंगचा धोकाही वाढला आहे. महावितरणच्या धोरणानुसार गळतीचे प्रमाण वाढलेल्या भागात लोडशेडिंग केली जाते. आता शहरातील वीज गळती विक्रमी वाढल्याने पुन्हा लोडशेडिंग लागू होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.