शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 14:44 IST

रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

औरंगाबाद : एमआयएमच्या हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद लोकसभा संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. 

आज सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एमआयएमच्या दार-उस्स- सलाम या पक्ष कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयएमचे सर्व २३ नगरसेवक, पक्षनेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खा. असदोद्दीन ओवेसी प्रचारात व्यस्त आहेत. हैदराबाद येथे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम सुरू केले आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, असा स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

रात्री होणार अंतिम निर्णय जिल्ह्यातील मुस्लिम, दलित मतांची संख्याही काढण्यात आली आहे. लोकसभेला ५२ ते ५५ टक्के मतदान होते. मतदानाची ही टक्केवारी गृहीत धरून उमेदवार निवडून येऊ शकतो का? याचेही गणित एमआयएम कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर आज झालेल्या सभेत मांडले. खासदार ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

एमआयएमच्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्षऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढत पाहायला मिळेल. एमआयएम पक्षप्रमुखांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास या मतदारसंघात पारंपरिक सेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लिम, दलित मतांचे विभाजन झाल्यास याचा थेट फायदा युतीच्या उमेदवाराला होईल, असेही जाणकारांचे मत आहे. प्रत्येक निवडणुकीत सेनेला मत विभाजनाचा चांगलाच फायदा झालेला आहे. यंदाही त्रिकोणी लढत होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद