शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्ह्यातील बाजार समित्यांत निवडणूक अटळ

By admin | Updated: November 10, 2014 01:15 IST

जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने

जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह व संचालकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.राज्यात नवे सरकार अरुढ झाले आहे. पाठोपाठ या सरकारने अल्पावधीतच काही धक्कादायक असे निर्णय घेतले आहेत. विशेषत: सहकार क्षेत्रातील संचालकांची मुदत संपलेल्या संस्थांवर प्रशासक नियुक्ती पाठोपाठ व निवडणुकांचा कार्यक्रम लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे लगेचच साद पडसाद उमटू लागले आहेत. गाव पातळीवरील सोसायट्या, तालुकास्थानांच्या खरेदीविक्री संघांसह, बाजार समित्यांत मोठी खळबळ उडाली आहे. या जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील अरुढ पदाधिकाऱ्यांसह संचालक कमालीचे हादरले आहेत. कारण जिल्ह्यातील जालना कृषी उत्पन्नबाजार समितीसह भोकरदन, अंबड येथील बाजार समित्यांवरील संचालक मंडळाची मुदत अनेक महिन्यापूर्वीच संपली आहे. त्या संचालक मंडळांना पूर्वीच्या सरकारने वारवांर मुदत वाढ दिली. परिणामी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना मुदत संपून सुद्धा सत्ता उपभोगता आली.लोकसभा निवडणुका पाठोपाठ विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे सहकार क्षेत्रातील मात्तबर कमालीचे सुखावले होते. परंतु नव्या सरकारने दिलेल्या तडाख्यानंतर या पदाधिकाऱ्यांसह संचालकांना आता सत्तेवरुन पाय उतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. सहकार खात्याकडून लवकरच म्हणजेच पुढील आठवड्यातच त्या त्या बाजार समित्यांसह सोसायट्यांवर प्रशासकाची नियुक्ती होईल, असा अंदाज आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकूण १७० बाजार समित्यांपैकी संचालक मंडळांची मुदत संपलेल्या ४५ बाजार समित्यांची यादी मागविली आहे. विशेषत: काँग्रेस आघाडी सरकारने प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या समित्यांची यादी प्राधान्याने मागविली असून, त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील हे मात्तबर चक्रावून गेले आहेत. अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर येथील बाजार समितीही मात्तबरांच्या ताब्यात आहेत. (वार्ताहर)या जिल्ह्यात काँग्रेस आघाडीबरोबर आता सत्तारुढ गटांतील म्हणजे भाजपसह शिवसेनेतील मात्तबर पुढाऱ्यांच्या ताब्यात सहकारी संस्था आहेत. जालना बाजार समितीवर माजीमंत्री अर्जुन खोतकर यांचे, भोक रदन बाजार समितीवर केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व आहे. जालना बाजार समितीच्या निवडणुकां संदर्भात गेल्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरु होत्या. परंतु त्या मंदावल्या. आता नव्या सरकारनेच घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या म्हणजे जालना बाजार समितीच्या निवडणुका होतील अशी चिन्हे आहेत.