शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक....एक रुपया खर्च न करता बनलो आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:38 IST

या गटबाजीमध्ये काँग्रेसकडून जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी रद्द केले.

१९७०  च्या दशकात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांचे गट तुल्यबळ होते. या गटबाजीमध्ये काँग्रेसकडून जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी रद्द केले. या झालेल्या मानहानीच्या बदल्यात काँग्रेसने अवघ्या महिनाभरात विधान परिषदेवर संधी देत एक रुपयाही खर्च न करता आमदार बनविले.

गंगापूर तालुक्यात काही युवकांना एकत्र करत शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी एका संस्थेची नोंदणी केली. या संस्थेच्या उद्घाटनासाठी विखे पाटील यांना बोलावले. कार्यक्रम झोकात झाला. शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९७१ साली भूविकास बँकेच्या निवडणुकीला उभे राहण्यास अनेकांनी गळ घातली. तेव्हा प्रस्थापित बाळासाहेब पवार गंगापूरचे आमदार होते. भूविकास बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रभान पाटील नांदेडकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मला १४०० मते मिळाली. नांदेडकरांना अवघी ७०० मते पडली. या निवडणुकीसाठी १७ रुपये खर्च आला होता. विजयी झाल्यामुळे गंगापूर तालुका काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. तालुकाध्यक्षपद मिळाले.

माणिकदादा पालोदकर हे यशवंतराव चव्हाण गटाचे होते. आम्ही यशवंतराव चव्हाण गटात सामील झालो, तर बाळासाहेब पवार, अप्पासाहेब नागदकर हे शंकरराव चव्हाण गटाचे. १९७२ मध्ये जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत २६ जानेवारी १९७२ या दिवशी गंगापूर विधानसभेसाठी बाळासाहेब पवार यांचे तिकीट कापून मला उमेदवारी दिली. यासाठी तालुका, जिल्हा, प्रदेश आणि केंद्रीय कार्यकारिणीने माझ्याच नावाची शिफारस केली होती. मात्र, मराठवाड्यात शंकरराव चव्हाण यांचे न ऐकता उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रार करून राज्यातील पाच जणांचे तिकीट रद्द करण्यास भाग पाडले. त्यात माझाही क्रमांक होता. १ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास निघालो असताना उमेदवारी रद्द झाल्याचे समजले. ही रद्द केलेली उमेदवारी बाळासाहेब पवार यांना देण्यात आली. गंगापूर तालुक्यात यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला. अनेकांनी अपक्ष लढण्यासाठी गळ घातली. लोकवर्गणी करण्यास सुरुवात केली. मात्र, काँग्रेसने घेतलेला निर्णय मान्य करून बंडखोरी करण्यास मी ठाम नकार दिला. आक्रमक समर्थकांचे ऐकले नाही. तेव्हा बाळासाहेब पवार यांनीही कौतुक केले. या जागेवर बाळासाहेब पवार जिंकले.

पुढे महिनाभराने विधान परिषदेचे नऊ आमदार सेवानिवृत्त होत होते. त्यात उमेदवारी रद्द केलेल्या सर्वांना आमदार बनविण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घेतला. ७ एप्रिल १९७२ रोजी विधान परिषदेचा आमदार झालो. एकही रुपया खर्च आला नाही. तेव्हा अप्पासाहेब नागदकर यांना सोबत घेऊन सर्व आमदारांची ओळख करून दिली. प्रत्येक बारीकसारीक गोष्टी समजून सांगितल्या. १९७८ पर्यंत विधान परिषदेचा आमदार होतो. याच काळात आणीबाणी लागली होती. पुढे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यशवंतराव चव्हाणांसह अनेकजण जुन्या काँग्रेसमध्ये कायम राहिले. इंदिरा काँग्रेसमध्ये अनेकांनी जाण्यास नकार दर्शविला. तेव्हा जुन्या काँग्रेसकडून गंगापूर विधानसभेसाठी तिकीट मिळाले.

जिल्ह्यातून जुन्या काँग्रेसचा एकमेव निवडून आलो. बाळासाहेब पवार, माणिकदादा पालोदकर अशा दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र, वर्षभराच्या आतच शरद पवार यांनी स्वतंत्र चूल मांडत जनता दलाच्या सहकार्याने वसंतदादाचे सरकार पाडले. तेव्हा जिल्ह्यातून शरद पवार यांच्यासोबत गेलेला एकमेव आमदार होतो. पुढे इंदिरा गांधी यांनी बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील शरद पवार यांचे सरकार बरखास्त करून टाकले. यामुळे आमची पाच वर्षांची आमदारकी अवघ्या दोन वर्षातच संपली. पुढील निवडणुकीत माझाही पराभव झाला. तेव्हापासून राजकारणापासून दुरावलो ते दुरावलोच. आमदारकी संपली तेव्हा अवघी ३५० रुपये पेन्शन मिळत होती. आता हीच पेन्शन ६० हजार रुपये मिळते. यातच समाधान आहे.

शब्दांकन : राम शिनगारे

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक