शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सनदी अधिकारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:16 IST

संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्दे दोन महिन्यात विश्वस्त मंडळ नेमण्याची शासनाची हमी

औरंगाबाद : यापुढे शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर थेट सनदी अधिकारी केडरमधून नेमण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्य शासनाला दिला. संस्थानवर दोन महिन्यात विश्वस्त मंडळ नेमण्यात येईल, अशी हमी राज्य शासनाकडून खंडपीठाला देण्यात आली.

संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. शासन नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करेपर्यंत अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिकचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आणि अहमदनगरचे सहधर्मादाय आयुक्त यांची तदर्थ समिती गठीत करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार खंडपीठाने ९ ऑक्टोबर २०१९ला दिले होते. ही समिती ऑक्टोबर २०१९पासून संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे आणि खंडपीठाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे.

सरळ नेमणुकीचा सनदी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमावा, अशी विनंती करणारा दिवाणी अर्ज याचिकाकर्ते यांच्यावतीने करण्यात आला होता. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद