शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर होणार जिल्हा परिषदेचा साडेअठरा हजार कोटींचा प्रस्ताव 

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:30 IST

उदारमनाने शासन पावते की थोड्याफार निधीची तरतूद करून तोंडाला पाने पुसते, यावरच जि.प.च्या विकासकामांचे नियोजन ठरेल.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. पण, स्वत:चे आर्थिक स्त्रोत मर्यादित असल्यामुळे प्रशासकीय इमारतीसाठी वाढीव खर्च, सिंचन, बांधकाम, कृषी, अंगणवाड्या, शाळाखोल्या अशा अनेक कामांसाठी जिल्हा परिषदेला शासनाच्या अर्थसहायावरच अवलंबून राहावे लागते. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने १८४८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, उदारमनाने शासन पावते की थोड्याफार निधीची तरतूद करून तोंडाला पाने पुसते, यावरच जि.प.च्या विकासकामांचे नियोजन ठरेल. पालकमंत्री संदीपान भुमरे यांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली असल्यामुळे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना प्रलंबित विकासकामांसाठी सढळ हाताने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने विभागनिहाय कामांसाठी लागणाऱ्या १८४८ कोटी ५७ लाखांच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे.

यात ७२३ अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ८३ कोटी ३४ लाख आणि अंगणवाड्यात डिजिटल उपकरणे, सोलार, विद्युत पुरवठा, पाणी शुद्धिकरण यंत्र खरेदीसाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांचे तसेच स्मार्ट अंगणवाड्यांसाठी ८ कोटी ५७ लाखांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी ४५२ कोटी, प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५७ कोटी, जि.प. तसेच पंचायत समित्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १८२ कोटी रुपये, बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, इमारतींची डागडुजी, तीर्थस्थळांच्या विकासासाठी ७२४ कोटी रुपये, वर्गखोल्यांचे बांधकाम, निजामकालीन शाळाखोल्यांच्या बांधकामासाठी आवश्यक लोकवर्गणी तसेच शाळांचे थकलेले विद्युत बिल अदा करण्यासाठी असे मिळून ४३३ कोटी ५१ लाख रुपये, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ५० कोटी रुपये यासह पशुसंवर्धन, कृषी, पंचायत विभाग आदींच्या कामांसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण पर्यटनावरही भरग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी दौलताबादलगत मोमबत्ता तलावात नौकाविहार व कॅपिंगसाठी १० कोटी रुपये, म्हैसमाळ येथे पायाभूत सुविधांसाठी ६ कोटी रुपये, वेरूळ परिसर विकासासाठी ९ कोटी रुपये, सुलीभंजन पर्यटन विकासासाठी आठ कोटी रुपयांची गरज असून, यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केला जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार