शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर होणार जिल्हा परिषदेचा साडेअठरा हजार कोटींचा प्रस्ताव 

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:30 IST

उदारमनाने शासन पावते की थोड्याफार निधीची तरतूद करून तोंडाला पाने पुसते, यावरच जि.प.च्या विकासकामांचे नियोजन ठरेल.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. पण, स्वत:चे आर्थिक स्त्रोत मर्यादित असल्यामुळे प्रशासकीय इमारतीसाठी वाढीव खर्च, सिंचन, बांधकाम, कृषी, अंगणवाड्या, शाळाखोल्या अशा अनेक कामांसाठी जिल्हा परिषदेला शासनाच्या अर्थसहायावरच अवलंबून राहावे लागते. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने १८४८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, उदारमनाने शासन पावते की थोड्याफार निधीची तरतूद करून तोंडाला पाने पुसते, यावरच जि.प.च्या विकासकामांचे नियोजन ठरेल. पालकमंत्री संदीपान भुमरे यांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली असल्यामुळे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना प्रलंबित विकासकामांसाठी सढळ हाताने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने विभागनिहाय कामांसाठी लागणाऱ्या १८४८ कोटी ५७ लाखांच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे.

यात ७२३ अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ८३ कोटी ३४ लाख आणि अंगणवाड्यात डिजिटल उपकरणे, सोलार, विद्युत पुरवठा, पाणी शुद्धिकरण यंत्र खरेदीसाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांचे तसेच स्मार्ट अंगणवाड्यांसाठी ८ कोटी ५७ लाखांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी ४५२ कोटी, प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५७ कोटी, जि.प. तसेच पंचायत समित्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १८२ कोटी रुपये, बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, इमारतींची डागडुजी, तीर्थस्थळांच्या विकासासाठी ७२४ कोटी रुपये, वर्गखोल्यांचे बांधकाम, निजामकालीन शाळाखोल्यांच्या बांधकामासाठी आवश्यक लोकवर्गणी तसेच शाळांचे थकलेले विद्युत बिल अदा करण्यासाठी असे मिळून ४३३ कोटी ५१ लाख रुपये, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ५० कोटी रुपये यासह पशुसंवर्धन, कृषी, पंचायत विभाग आदींच्या कामांसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण पर्यटनावरही भरग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी दौलताबादलगत मोमबत्ता तलावात नौकाविहार व कॅपिंगसाठी १० कोटी रुपये, म्हैसमाळ येथे पायाभूत सुविधांसाठी ६ कोटी रुपये, वेरूळ परिसर विकासासाठी ९ कोटी रुपये, सुलीभंजन पर्यटन विकासासाठी आठ कोटी रुपयांची गरज असून, यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केला जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार