शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसाआड पाणी

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना पाणी मिळत होते. त्यात अल्पशी सुधारणा करीत हा पाणीपुरवठा आठ दिवसांआड करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये आठ दिवसांना पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. महानगरपालिकेच्या वतीने राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. परभणीची पाणीपुरवठा योजना तीस वर्षापूर्वीची आहे. दीड लाख लोकांना पाणी पुरविण्याची क्षमता या योजनेची आहे. परंतु, सध्या शहराची लोकसंख्या तीन लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अपुरी पडते. नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शहरासाठी मुबलक पाणीसाठाही उपलब्ध आहे. परंतु, मनपाचे नियोजन होत नसल्याने पाणीपुरवठा वेळेवर व नियमित होेत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात शहराला ११ व्या दिवशी पाणी मिळत होते. महिन्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा होत होता. पाण्याची ओरड वाढल्यानंतर महानगरपालिकेने नियोजन केले असून आता हा पाणीपुरवठा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आठ दिवसांतून एक वेळ म्हणजे महिन्यातून चार किंवा पाच वेळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)