शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आठ दिवसाआड पाणी

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना पाणी मिळत होते. त्यात अल्पशी सुधारणा करीत हा पाणीपुरवठा आठ दिवसांआड करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये आठ दिवसांना पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. महानगरपालिकेच्या वतीने राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. परभणीची पाणीपुरवठा योजना तीस वर्षापूर्वीची आहे. दीड लाख लोकांना पाणी पुरविण्याची क्षमता या योजनेची आहे. परंतु, सध्या शहराची लोकसंख्या तीन लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अपुरी पडते. नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शहरासाठी मुबलक पाणीसाठाही उपलब्ध आहे. परंतु, मनपाचे नियोजन होत नसल्याने पाणीपुरवठा वेळेवर व नियमित होेत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात शहराला ११ व्या दिवशी पाणी मिळत होते. महिन्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा होत होता. पाण्याची ओरड वाढल्यानंतर महानगरपालिकेने नियोजन केले असून आता हा पाणीपुरवठा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आठ दिवसांतून एक वेळ म्हणजे महिन्यातून चार किंवा पाच वेळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)