शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानातून अहंकार यायला नको; तरच न्याय प्रस्थापित करता येईल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 05:59 IST

हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे गरजेचे होते. या प्रांतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सर्वांना समान हक्क व न्याय देईल.

छत्रपती संभाजीनगर : कायद्याच्या विद्यार्थ्यांनी तर्क आणि संवादाला महत्त्व देत कायम न्यायासाठी काम करीत असल्याची जाणीव ठेवावी. ज्ञानातून माणसाला अहंकार येतो. तो कधीही येऊ देऊ नका, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित करू शकाल, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा विद्यापीठात साजरा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले, पूर्वीचा कायदा स्वातंत्र्यसैनिकांना मंडालेपासून अंदमानपर्यंत शिक्षा देण्यासाठी पाठवत होता. तुमच्या आमच्यावर हुकूमत गाजविण्यासाठी वापरला जात होता. आजचा कायदा हा न्याय देण्यासाठी आहे. तुम्ही कायद्याची व्याख्या कशी करता, त्यानुसार ते ठरत असते. 

हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे गरजेचे होते. या प्रांतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सर्वांना समान हक्क व न्याय देईल. ते मुक्तिसंग्राम दिनामुळे साध्य झाले. कायद्याच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की, न्यायालयात जाऊन खटले लढवणे, युक्तिवाद करणे एवढाच वाव या क्षेत्रात आहे. पण, तसे नाही. १९८२ साली मी वकिलीला सुरुवात केली, तेव्हा मर्यादित वाव होता. आता कक्षा रुंदावल्या आहेत. तुमचे ध्येय समजून घेऊन काम करा, असेही ते म्हणाले.

टेक वर्क सिरिअसलीविद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काम करतो ते गांभीर्याने घेतले पाहिजे. मात्र, स्वत:ला तेवढे गंभीरपणे घेऊ नका, असा सल्लाही सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी दिला. मराठवाड्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केल्याचा उल्लेखही त्यांनी सुरुवातीला केला.