शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राजकारणातील ‘अंडरकरंट’ प्रवाहित करण्यासाठी बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:31 IST

वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

ठळक मुद्देशांतीगिरी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष  समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत विचारमंथन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ तारखेपर्यंत प्रचाराची मुदत असून, ११ दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. यादरम्यान ‘अंडरकरंट’ राजकारणासाठी बैठकींचे नियोजन करण्यात येत असून, मराठा समाजाने त्यामध्ये आघाडी घेतली आहे. समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत बैठकांमध्ये विचारमंथन होत आहे. विशेष करून वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

बैठकींचे सत्र सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. शहरामध्ये पुढच्या आठवड्यापासून तयारी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आणि समाज या पार्श्वभूमीवरच या बैठकांचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या सगळ्या बैठकांच्या सत्रामध्ये शांतीगिरी मौनगिरी महाराजांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांतील प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महाराज आणि जय बाबाजी परिवाराचे सर्व समाज समावेशक भक्त आहे. त्यामुळे महाराज काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. इतर समाज मतदारांच्या देखील छोटेखानी बैठका होत आहेत. त्यामध्येदेखील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा राबविण्याबाबत चर्चा होत असल्याचे ऐकिवात आहे. 

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या जरी आपापल्या पक्षाचे उपरणे घालून उमेदवारांचा प्रचार करीत असले तरी समाज म्हणून त्यांनाही बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकांचे स्वरूप व्यापक नसून छोटेखानीच असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वानुमते मोठा समाज मेळावादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

महाराजांनी अजून निर्णय घेतलेला नाहीशांतीगिरी मौनगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा सोशल मीडियात होती. याबाबत प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराजांनी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराज पाठिंबा देण्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडणार आहेत. सोशल मीडियातील माहिती चुकीची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Politicsराजकारण