शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पीपीई कीटचा कोरोना योद्ध्यांच्या शरीरावर परिणाम; हजारोंना निरोगी करणाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 20:00 IST

घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देआहार, निवासस्थान, क्वारंटाईनकडे दुर्लक्ष, अतिरिक्त कामाचा भार

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद :  कोरोनाच्या महामारीतून नागरिकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना  कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिवसातील अनेक तास सतत पीपीई कीट घालावे लागते. त्याचा साईड इफेक्टही आता त्यांना जाणवू लागला असून, त्यामुळे त्यांच्या अंगावर चट्टे पडून त्वचेला आजार जडतो आहे. हा प्रकार लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले; परंतु आरोग्याच्या दृष्टीने इतर गोष्टींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी कोरोना योद्ध्यांकडून होत आहे.

घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली, असे मार्ड संघटनेने सांगितले. तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. निवासी डॉक्टरांनी १४ दिवस सेवा दिल्यानंतर त्यांना किमान ५ दिवस क्वारंटाईन केले पाहिजे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होतेय, अशी ओरड होत आहे.घाटीत तब्बल २७० चतुर्थश्रेणी कर्मचारी ५० वर्षांवरील आहेत. त्यामुळे  त्यांना कोरोना वॉर्डाऐवजी अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अशा नॉनकोविड रुग्णसेवेच्या ठिकाणी काम दिले जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी १३० कर्मचारी सेवा देत आहेत. २०८ पदे रिक्त असल्याने या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या तणावाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात परिचारिकांना निवास आणि आहाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

आधी लॅमिनेटेड, आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीटपीपीई कीटमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगावर चट्टे आले. उकाड्यामुळे हा प्रकार झाला. ही बाब लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले. आधी लॅमिनेटेड होते. यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर येत नव्हता. आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीट वापरले जात आहे. त्यामुळे आता कोणताही त्रास होत नाही, असे प्रशासनाने सांगितले.

सॅनिटायझरही मिळत नाहीचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरही मिळत नाही. आरोग्याच्या काळजीसह सकस आहार मिळाला पाहिजे.-रवींद्र दाभाडे, अध्यक्ष, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ

क्वारंटाईनचा कालावधी वाढवाकोरोनासह आता नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत आहे.  त्यामुळे एमबीबीएस डॉक्टर घेतले पाहिजेत. निवासी डॉक्टरांच्या क्वारंटाईनचा कालावधी किमान ५ ते ७ दिवस हवा.-डॉ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड

कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणीघाटीतील डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांच्या राहण्याची आणि आहाराची व्यवस्थाही आहे. पीपीई कीटमुळे उकाड्याने अंगावर चट्टे येण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांत दिसून आला. पीपीई कीट बदलण्यात आल्याने आता हा प्रकार होत नाही.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

पीपीई कीट, मास्क दिले जातातजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रमाणात पीपीई कीट, मास्क पुरविण्यात येतात. त्यांची अधूनमधून तपासणीही केली जाते. आजपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याने आरोग्याच्या दृष्टीने तक्रार केलेली नाही.-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद