शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

पीपीई कीटचा कोरोना योद्ध्यांच्या शरीरावर परिणाम; हजारोंना निरोगी करणाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 20:00 IST

घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देआहार, निवासस्थान, क्वारंटाईनकडे दुर्लक्ष, अतिरिक्त कामाचा भार

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद :  कोरोनाच्या महामारीतून नागरिकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना  कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिवसातील अनेक तास सतत पीपीई कीट घालावे लागते. त्याचा साईड इफेक्टही आता त्यांना जाणवू लागला असून, त्यामुळे त्यांच्या अंगावर चट्टे पडून त्वचेला आजार जडतो आहे. हा प्रकार लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले; परंतु आरोग्याच्या दृष्टीने इतर गोष्टींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी कोरोना योद्ध्यांकडून होत आहे.

घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली, असे मार्ड संघटनेने सांगितले. तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. निवासी डॉक्टरांनी १४ दिवस सेवा दिल्यानंतर त्यांना किमान ५ दिवस क्वारंटाईन केले पाहिजे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होतेय, अशी ओरड होत आहे.घाटीत तब्बल २७० चतुर्थश्रेणी कर्मचारी ५० वर्षांवरील आहेत. त्यामुळे  त्यांना कोरोना वॉर्डाऐवजी अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अशा नॉनकोविड रुग्णसेवेच्या ठिकाणी काम दिले जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी १३० कर्मचारी सेवा देत आहेत. २०८ पदे रिक्त असल्याने या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या तणावाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात परिचारिकांना निवास आणि आहाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

आधी लॅमिनेटेड, आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीटपीपीई कीटमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगावर चट्टे आले. उकाड्यामुळे हा प्रकार झाला. ही बाब लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले. आधी लॅमिनेटेड होते. यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर येत नव्हता. आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीट वापरले जात आहे. त्यामुळे आता कोणताही त्रास होत नाही, असे प्रशासनाने सांगितले.

सॅनिटायझरही मिळत नाहीचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरही मिळत नाही. आरोग्याच्या काळजीसह सकस आहार मिळाला पाहिजे.-रवींद्र दाभाडे, अध्यक्ष, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ

क्वारंटाईनचा कालावधी वाढवाकोरोनासह आता नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत आहे.  त्यामुळे एमबीबीएस डॉक्टर घेतले पाहिजेत. निवासी डॉक्टरांच्या क्वारंटाईनचा कालावधी किमान ५ ते ७ दिवस हवा.-डॉ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड

कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणीघाटीतील डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांच्या राहण्याची आणि आहाराची व्यवस्थाही आहे. पीपीई कीटमुळे उकाड्याने अंगावर चट्टे येण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांत दिसून आला. पीपीई कीट बदलण्यात आल्याने आता हा प्रकार होत नाही.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

पीपीई कीट, मास्क दिले जातातजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रमाणात पीपीई कीट, मास्क पुरविण्यात येतात. त्यांची अधूनमधून तपासणीही केली जाते. आजपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याने आरोग्याच्या दृष्टीने तक्रार केलेली नाही.-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद