शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली तासिका

By admin | Updated: December 22, 2015 23:56 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेचा प्रश्न छेडला.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेचा प्रश्न छेडला. तेव्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सभागृहात अत्यंत धाडसाने अर्धा तास निवेदन करून राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा वृत्तांन्तच सादर केला. गुणवत्ता नाही हे मान्य आहे; पण अलीकडे शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन अनेक शाळा ‘आयएसओ’ केल्या. अनेक शाळांमध्ये रचनावाद शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्याचे सांगितले. आपला विभाग कात टाकत आहे, असे सांगत देशमुख यांनी काही क्षणातच सभागृहातील सदस्यांची मने जिंकली, हे विशेष!झाले असे की, जि.प. सदस्य डॉ. सुनील शिंदे, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ, पुष्पा जाधव यांनी काही खाजगी स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचा दाखला देत जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिताही येत नाही व वाचता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.तेव्हा सभागृहात बसलेले शिक्षणाधिकारी तात्काळ उठले व मी आपला अर्धा तास घेणार आहे, असे सांगत निवेदनाला सुरुवात केली. ते म्हणाले की, आपला आरोप मला मान्य आहे; पण सद्य:स्थिती आता तशी राहिलेली नाही.महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला असून जूनपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती स्वीकारण्यात आली आहे. प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची ही पद्धत कुमठे बिटमध्ये यशस्वी झाली. तेथे आतापर्यंत १२०० शिक्षकांनी भेट देऊन कशा पद्धतीने शिक्षण दिले जाते, त्याचे अवलोकन केले. ३१ डिसेंबरपर्यंत आणखी १६०० शिक्षक तेथे भेट देणार आहेत.