शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

सिल्लोड तालुक्यात शिक्षणाचा बाजार

By admin | Updated: July 15, 2017 18:39 IST

आपल्याच तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने व शिक्षणाचा बाजार झाल्याने पालक, विद्यार्थी रडकुंडीला आले आहेत.

श्यामकुमार पुरे/ऑनलाईन लोकमत

 
औरंगाबाद/ सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी बारावीत ४ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रवेश कोटा ३ हजार १२० एवढाच असल्याने महाविद्यालयात प्रवेशासाठी जास्तीची रक्कम उकलण्यात येत आहे. आपल्याच तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने व शिक्षणाचा बाजार झाल्याने पालक, विद्यार्थी रडकुंडीला आले आहेत.
 
तालुक्यात ८ महाविद्यालये असून बहुतेक संस्थाचालकांनी जास्तीची फी घेऊन पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. तर प्रवेश फुल्ल झाल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालयात आर्थिक लूट केली जात आहे. अधिकृतरित्या १ हजार ७९३ विद्यार्थी विविध महाविद्यालयात प्रवेशासाठी चकरा मारत आहेत. यातच काही संस्थाचालकांनी गोरखधंदा सुरु करुन प्रवेशासाठी अधिक रक्कम उकळत स्वत:ची तुंबडी भरुन घेण्याचा सपाटा लावला आहे.
 
तालुक्यातील जवळपास सर्वच  महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे प्रथम वर्षांचे प्रवेश बंद झाले आहेत. यामुळे प्रवेशाचा कोटाच शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रवेश मिळत नसल्याने पालक व विद्यार्थी भयभीत झाले आहे.  तालुक्यात उत्तीर्णांच्या तुलनेत उच्च शिक्षण देणा-या महाविद्यालयांची  संख्या अतिशय कमी आहे. शासनाने  तुकड्या वाढवून द्याव्या किंवा दुसरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
 
सिल्लोड तालुक्यातील एकूण महाविद्यालये व कोटा
एकूण महाविद्यालये ८
कला-१६८०
वाणिज्य-३६०
विज्ञान-१०८०
एकूण जागा-३१२०
उत्तीर्ण विद्यार्थी -४९१३
 
प्रवेश फुल्ल अनेक विद्यार्थी वेटिंगवर...
नवीन तुकडीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी काही महाविद्यालयांनी प्रवेश फुल्ल झाल्यावरसुद्धा वेटिंगमध्ये १०० ते १५० विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करुन घेतले आहे. परवानगी मिळाल्यावर त्यांचे प्रवेश निश्चित केले जातील, अशी हमी विद्यार्थ्यांना दिली जात आहे.
 
पाच ते दहा हजारापर्यंत दर
अनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी कला शाखेला ८१० रुपये, वाणिज्य -११२० व विज्ञान शाखेसाठी ३८५० रुपये अशी फी आहे, तर अनुदानित महाविद्यालयासाठी कला शाखेला २४१०, वाणिज्य -२७२०, विज्ञान शाखेला ५८५० अशी फी आहे. पण काही संस्थाचालक प्रवेश फुल्ल झाल्याची बतावनी करुन पाच ते दहा हजार रुपये जास्तीचे वसूल करीत आहेत.
 
बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी
महविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने प्रवेश द्यावा, असा नियम आहे. पण काही महाविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थी वगळून बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जादा पैसे घेऊन प्रवेश दिला जात आहे. त्यात काही विद्यार्थी नोकरदार, कर्मचारी आहेत.
 
परीक्षेलाच उघडते महाविद्यालयाचे दार
तालुक्यातील काही महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होतात. तर काही महाविद्यालयात होत नाही. वर्षभर केवळ आॅफिस सुरु असते. काही शिक्षक येतात. बसून राहतात. पण विद्यार्थी येत नाही. विद्यार्थी येतात केवळ परीक्षेला. परीक्षा आली की महाविद्यालयाचे दार उघडले जाते. प्रात्यक्षिक होते अन् शाळेच्या निकालाची टक्केवारी वाढते. यासाठी मात्र मोठा पैसा मोजावा लागतो.  
 
सुविधा असेल तरच मिळेल परवानगी
ज्या महाविद्यालयात सर्व बेसिक सुविधा आहेत, त्यांचे जलदगतीने प्रस्ताव मागवून तुकड्या वाढवून देण्यासाठी ७ जुलै रोजी नवीन जीआर काढला आहे. त्यासाठी महाविद्यालयांना २० जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवायचा आहे. ज्या महाविद्यालयाकडे बेसिक सुविधा आहेत, त्यांना तुकड्या वाढीची परवानगी मिळेलही, पण तालुक्यात असे बोटावर मोजण्याइतकेच महाविद्यालये आहेत. बाकी महाविद्यालयांचे काय, विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा सुटेल, याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
 
जिल्ह्याकडे धाव
तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने काही विद्यार्थी जिल्ह्याच्या तर काहीनी परजिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.