शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामस्थाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लाईनमनला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:10 IST

डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.औरंगाबाद तालुक्यातील करजंगाव शिवारातील रावसाहेब बोराडे यांच्या शेतातील विजेची डीपी जळाली होती. ती दुरुस्त करावी किंवा नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गाढेजळगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात केली होती. त्या कार्यालयातील लाईनमन विष्णू श्यामराव वाघ यांनी नवीन डीपी बसवावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे गावात वर्गणी गोळा करण्यात आली. जमा झालेल्या पैशातून डीपी घेण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी लाईनमन विष्णू वाघ डीपी घेऊन गावात आला. त्याने डीपीवर चढवण्यासाठी मदतीला येण्याचे आवाहन केल्यामुळे आठ ते दहा जण आले. शिवारातील नादुरुस्त डीपी काढण्यासाठी चंद्रभान पुंजाराम बोरुडे आणि सुभाष भेरे हे दोघेजण खांबावर चढले. तत्पूर्वी या दोघांनी लाईनमन वाघ यास वीज बंद आहे का अशी विचारणा केली असता वाघने वीजपुरवठा बंद आहे, असे सांगितले. दरम्यान वर चढलेले चंद्रभान बोरुडे यास वरच्या विजेच्या तारेला उलटा हात लावून बघ वीज बंद आहे का? असे सांगितले. चंद्रभान याने विजेच्या तारेस उलटा हात लावताच त्याला विजेचा धक्का लागला. यामध्ये त्याचे दोन हात आणि डाव्या पायाची मांडी जळाली आणि तो खाली कोसळला. गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे तो जागीच मरण पावला असल्याचे पुंजाराम बोरुडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून करमाड पोलीस ठाण्यात लाईनमन वाघ विरोधात भादंवि कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. धडबे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सुनावणीवेळी सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये लाईनमन दोषी आढळल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली.