शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकाच्या क्रांतीमुळे आर्थिक समृद्धी

By admin | Updated: June 10, 2014 00:17 IST

विश्वास साळुंके, वारंगाफाटा वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे.

विश्वास साळुंके, वारंगाफाटावारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे. म्हणूनच ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा हळद व कापूस लागवडीची लगबग दिसून येत आहे. गतवर्षी वारंगाफाटा परिसरातील अनेक उत्पादकांनी ठिबक सिंचनाचा वापर करून विक्रमी उत्पादन काढले. परिणामी परिसरात आर्थिक समृद्धी आल्याने ठिबक सिंचनाची क्रांती घडून येत आहे.आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा अधिक वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकीकडे ठिबक सिंचन संच खरेदीचा खर्च तेवढा लागत आहे. दुसरीकडे मात्र निंदणी, खत टाकणी व इतर मशागतीची कामे ठिबक सिंचनामुळे सुलभ, कमी वेळेची आणि अल्पखर्ची ठरत आहेत. कारण कृषीपंपाला दिवसाकाठी केवळ ८ तास वीज मिळत आहे. या वेळेत संपूर्ण क्षेत्र भिजणे कठीण असल्याने ठिबक सिंचन उपयोगी पडत आहे. ठिबकामुळे एका तासात एक ते दोन एकर जमिनीवरील पिके पाण्याच्या आवश्यकतेनुसार समान पाणी देऊन भिजत आहेत. मोकाट पाणी दिले नसल्याने तणाची उगवण कमी झाल्याने पिकांच्या ंिनंदणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला जातो. शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी काढून घेतल्याने रासायनिक खत खरेदी करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. उलट बाजारात पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध झाली आहेत. ही खते ठिबकाद्वारे पिकांना आवश्यकतेनुसार व कमी वेळात देता येतात. त्यामुळे खतांसाठी लागणारा खर्च व वेळेची बचत होते. पारंपारिक पद्धतीने रासायनिक खत पिकांना लागू होण्यास फार दिवस लागतात; मात्र पाण्यातून दिलेली खते केवळ ४८ तासांत पिकांला लागू होतात. शिवाय खर्च व मेहनतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. सर्व बाबींचा विचार करून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यातून पिकांचे उत्पादन दुप्पटीनेच वाढल्याने उत्पादकांना लाखो रूपयांचा माल झाला. म्हणून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात आर्थिक सुबत्ता आल्याने ठिबक क्रांती घडत आहे. दहा वर्षांपासून ठिबक सिंचनाद्वारे दरवर्षी कापूस, हळद, केळी आदी महत्वाची पिके घेत आहे. दरवर्षी ४० ते ४५ क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळते. यापूर्वी ठिबक सिंचन नसताना केवळ २५ ते ३० क्विंटल एवढेच हळदीचे उत्पादन होत होते. तसेच दरवर्षी किमान २५ ते २७ क्विंटल कापूस एका एकरात होत आहे. प्रतिवर्षी सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन वाढल्याने ठिबक ही काळाची गरज बनली आहे. - नामदेवराव साळुंके, वारंगाफाटा