शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:40 IST

शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.

औरंगाबाद : शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. या अंतर्गत येत्या सोमवार, १२ मार्चपासून प्रत्यक्षात धान्याचा ई-लिलाव (हर्राशी)ला सुरुवात होणार आहे. अडत्याने किंवा खरेदीदाराने परस्पर शेतीमाल खरेदी केला, तर कारवाई करण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यासाठी राज्यातील ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या ३० मध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित  शेतकर्‍याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने ‘ई-नाम’ योजना सुरू करण्यात आली आहे.

जाधववाडीतील बाजार समितीमध्ये यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून येथील प्रशिक्षित कर्मचार्‍यांनी धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले. आता प्रत्यक्षात ई-लिलाव करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच बाजार समितीने सर्व अडते व खरेदीदारांना ‘परिपत्रक’ पाठविले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, १२ मार्चपासून बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात येणार्‍या प्रत्येक शेतीमाल व शेतकर्‍याची नोंद करण्यात येणार आहे. यानंतर सर्व शेतकर्‍यांच्या शेतीमालाने भरलेल्या गाड्या सेल हॉल क्र. २ येथे आणण्यात येतील. येथेच ई-लॅब असणार आहे. तिथेच धान्याचे नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करण्यात येईल व माहिती ई-नाम पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्यानुसार खरेदीदारांना ई-लिलावाद्वारे शेतीमाल खरेदी करावा लागेल. तोंडी हर्राशी सोमवारपासून बंद होणार आहे. ज्यांच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढ्याच किमतीचा शेतीमाल खरेदीची मुभा देण्यात येईल. माल खरेदी करताच खरेदीदारांच्या खात्यातून रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परस्पर शेतीमाल खरेदी करताना कोणी आढळून आले तर त्या खरेदीदारावर कारवाई करण्यात येईल. 

अडत्या, खरेदीदारांची बैठक ‘ई-नाम’चे परिपत्रक मिळताच मंगळवारी औरंगाबाद अडत व्यापारी संघटनेची तातडीची बैठक जाधववाडीत पार पडली. ई-नाममध्ये अडत्यांना कोणतेच स्थान नसल्याने अडत्यांनी काय करावे, असा संतप्त सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला. ई-नाम लागू करण्यात अनेक अडचणी आहेत. यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी आणलेला शेतीमाल अडत्याकडेच उतरविण्यात यावा, तिथेच हर्राशी करण्यात यावी, आदी सूचना यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात बाजार समितीला अडत्या व खरेदीदारांतर्फे  निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल, दिलीप गांधी, हरीश पवार, मधुकर निकम, राजेंद्र बादशहा, कैलास निकम, विजय पांडे, मुकेश गंगवाल, जुगलकिशोर दायमा आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Farmerशेतकरी