शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:40 IST

शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.

औरंगाबाद : शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. या अंतर्गत येत्या सोमवार, १२ मार्चपासून प्रत्यक्षात धान्याचा ई-लिलाव (हर्राशी)ला सुरुवात होणार आहे. अडत्याने किंवा खरेदीदाराने परस्पर शेतीमाल खरेदी केला, तर कारवाई करण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यासाठी राज्यातील ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या ३० मध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित  शेतकर्‍याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने ‘ई-नाम’ योजना सुरू करण्यात आली आहे.

जाधववाडीतील बाजार समितीमध्ये यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून येथील प्रशिक्षित कर्मचार्‍यांनी धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले. आता प्रत्यक्षात ई-लिलाव करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच बाजार समितीने सर्व अडते व खरेदीदारांना ‘परिपत्रक’ पाठविले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, १२ मार्चपासून बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात येणार्‍या प्रत्येक शेतीमाल व शेतकर्‍याची नोंद करण्यात येणार आहे. यानंतर सर्व शेतकर्‍यांच्या शेतीमालाने भरलेल्या गाड्या सेल हॉल क्र. २ येथे आणण्यात येतील. येथेच ई-लॅब असणार आहे. तिथेच धान्याचे नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करण्यात येईल व माहिती ई-नाम पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्यानुसार खरेदीदारांना ई-लिलावाद्वारे शेतीमाल खरेदी करावा लागेल. तोंडी हर्राशी सोमवारपासून बंद होणार आहे. ज्यांच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढ्याच किमतीचा शेतीमाल खरेदीची मुभा देण्यात येईल. माल खरेदी करताच खरेदीदारांच्या खात्यातून रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परस्पर शेतीमाल खरेदी करताना कोणी आढळून आले तर त्या खरेदीदारावर कारवाई करण्यात येईल. 

अडत्या, खरेदीदारांची बैठक ‘ई-नाम’चे परिपत्रक मिळताच मंगळवारी औरंगाबाद अडत व्यापारी संघटनेची तातडीची बैठक जाधववाडीत पार पडली. ई-नाममध्ये अडत्यांना कोणतेच स्थान नसल्याने अडत्यांनी काय करावे, असा संतप्त सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला. ई-नाम लागू करण्यात अनेक अडचणी आहेत. यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी आणलेला शेतीमाल अडत्याकडेच उतरविण्यात यावा, तिथेच हर्राशी करण्यात यावी, आदी सूचना यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात बाजार समितीला अडत्या व खरेदीदारांतर्फे  निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल, दिलीप गांधी, हरीश पवार, मधुकर निकम, राजेंद्र बादशहा, कैलास निकम, विजय पांडे, मुकेश गंगवाल, जुगलकिशोर दायमा आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Farmerशेतकरी