शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:06 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत.

ठळक मुद्दे व्हायरल पोस्टमधून आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवार

औरंगाबाद : सोशल मीडियातून (समाज माध्यम) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराचा धुराळा उडतो आहे. हा प्रचार सर्व उमेदवारांच्या समर्थकांमार्फत केला जात असून, त्यात आचारसंहितेचे नियम पाळले जात आहेत की नाहीत, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत. असे असताना एक्झिट पोल घेणे, उमेदवारांच्या पोस्टवर टीका करणे, कोण होणार आमदार, म्हणून सर्व्हे करण्याचे प्रकार समोर येत आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांनी केलेल्या पोस्ट व्हायरल होऊन त्यातूनही आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार होताना दिसतो आहे.  यावर सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील समिती दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या तरी दिसते आहे. सोशल मीडियातील प्रचाराबाबत तक्रार आली तरच समिती दखल घेऊन कारवाई करते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. अद्याप सोशल मीडियातील प्रसाराबाबत एकही तक्रार आली नसल्याचेही समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड जिल्ह्यातील ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदाच्या निवडणुकीत विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रमुख उमेदवार प्रत्यक्ष प्रचारासह सोशल मीडियातही अग्रेसर आहेत. समर्थकांच्या माध्यमातून विविध पोस्ट, मजकूर, छायाचित्रे सोशल मीडियात फॉरवर्ड केली जात आहेत. त्याशिवाय इतरही उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती अशी या निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, या निवडणुकीत सोशल मीडियासाठी आचारसंहितेचे काय नियम आहेत, ते बघावे लागेल.

मराठवाड्यात ३५ उमेदवारांत लढतमराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रत्येक उमेदवाराचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSocial Mediaसोशल मीडियाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय