शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे

By मुजीब देवणीकर | Updated: March 22, 2023 18:59 IST

मौलाना अब्दुल रशीद मदनी यांचा सल्ला; या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा गुरुवार, २३ मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर पवित्र रमजानला सुरुवात होईल. शुक्रवारी पहिला रोजा असेल. यानिमित्ताने शहरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. मशिदींमध्ये रात्री ‘तरावीह’च्या नमाजसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यादृष्टीने सर्वत्र तयारी सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ (संयम), ‘तखवा’ (धार्मिकता) धारण करावे, असा सल्ला मौलाना अब्दुल रशीद मदनी यांनी दिला.

रमजान महिन्यात गरीब-श्रीमंत ही दरी आपोआप कमी होते. अल्लाहकडे सर्वच समान आहेत. या महिन्यात खुल्या मनाने माफी मागितल्यानंतर सर्व गुन्हे माफ होतात. अल्लाहने पूर्वी ५० दिवस रोजे ठेवण्याचा आदेश दिला होता. प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांनी अल्लाहला विनंती करून ३० दिवसांचे रोजे ठेवण्याची मान्यता घेतली. अल्लाहने उर्वरित २० रोजे ‘नफिल’ (ऐच्छिक) ठरविले. ऐच्छिक उपवास रमजान ईदनंतर ठेवण्याची मुभा दिली. सहा उपवास अनेक मुस्लिम बांधव ईदनंतर ठेवतात. त्याचप्रमाणे मोहर्रम, बकरी-ईद, शाबान आणि रज्जब महिन्यात उर्वरित उपवास ठेवण्यात येतात. नफिल रोजे ठेवण्याचे पुण्यही तेवढेच आहे.

यासंदर्भात मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी यांनी सांगितले की, ७ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक मुस्लिम बांधवावर ३० दिवसांचे रोजे बंधनकारक करण्यात आले आहेत. विविध आजार असतील तर अपवाद आहे, कारण नसताना रोजे न ठेवणे ही गंभीर बाब आहे. ज्यांनी उपवास ठेवले नाहीत, त्यांनी ईदच्या दिवशी रोजेदार बांधवांसोबत नमाजही अदा करू नये, असेही मौलाना रशीद मदनी यांनी नमूद केले. या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला. मागील १४०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून मुस्लिम बांधव न चुकता रोजा ठेवत आहेत. या महिन्यात गोर-गरिबांना मदत करण्याचे पुण्यही बरेच आहे.

७० पट जास्त पुण्यरमजान महिन्यात उपवास ठेवण्याची संधी मिळाली. या महिन्यात जेवढे पुण्य मिळविता येईल, तेवढे मिळविण्यात यावे. २४ तास मुस्लिम बांधवांनी ‘दर्ज’ (पठण) करीत रहावे, एका पुण्याचे महत्त्व सत्तर पुण्याईएवढे असते. मुस्लिम बांधवांनी रोजे पूर्ण करावेत.- मौलाना रशीद मदनी

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद