शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

दारणा धरणातून विसर्ग वाढविला

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी दारणातून सोडण्यात आलेला पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सोमवारी ११६८८ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. तसेच गंगापूर धरणातूनही ३६४७ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्या मंगळवारी जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडीच्या वरच्या भागात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. शिवाय गेल्या दोन तीन दिवसांपासून तेथे आणखी पाऊस होतो आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून खाली पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी दारणा धरणातून ५ हजार क्युसेक्सने आणि गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी दारणा धरणातून ११६८८ आणि गंगापूर धरणातून ३६४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. या दोन्ही धरणांतून सुमारे पंधरा हजार क्युसेक्सने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात पाणी येत आहे. बुधवारी येणार जिवंत साठ्यात... कडाचे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले की, वरच्या भागातील धरणांमधून सोडलेले पाणी अद्याप नागमठाणपर्यंत पोहोचले नाही. तेथून ते जायकवाडीत पोहोचेल. मात्र, आता वरच्या भागातून सुमारे साडेअकरा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ते पाणी पोहोचल्यावर जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. सध्या जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. ते जिवंतसाठ्यात येण्यासाठी २० दलघमीची गरज आहे. वरचे पाणी दाखल झाल्यास बुधवारीच हे धरण जिवंतसाठ्यात येण्याची शक्यता आहे.