शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणातून विसर्ग वाढविला

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी दारणातून सोडण्यात आलेला पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सोमवारी ११६८८ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. तसेच गंगापूर धरणातूनही ३६४७ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्या मंगळवारी जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडीच्या वरच्या भागात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. शिवाय गेल्या दोन तीन दिवसांपासून तेथे आणखी पाऊस होतो आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून खाली पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी दारणा धरणातून ५ हजार क्युसेक्सने आणि गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी दारणा धरणातून ११६८८ आणि गंगापूर धरणातून ३६४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. या दोन्ही धरणांतून सुमारे पंधरा हजार क्युसेक्सने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात पाणी येत आहे. बुधवारी येणार जिवंत साठ्यात... कडाचे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले की, वरच्या भागातील धरणांमधून सोडलेले पाणी अद्याप नागमठाणपर्यंत पोहोचले नाही. तेथून ते जायकवाडीत पोहोचेल. मात्र, आता वरच्या भागातून सुमारे साडेअकरा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ते पाणी पोहोचल्यावर जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. सध्या जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. ते जिवंतसाठ्यात येण्यासाठी २० दलघमीची गरज आहे. वरचे पाणी दाखल झाल्यास बुधवारीच हे धरण जिवंतसाठ्यात येण्याची शक्यता आहे.