शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

दारणा धरणातून विसर्ग वाढविला

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी दारणातून सोडण्यात आलेला पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सोमवारी ११६८८ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. तसेच गंगापूर धरणातूनही ३६४७ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्या मंगळवारी जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडीच्या वरच्या भागात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. शिवाय गेल्या दोन तीन दिवसांपासून तेथे आणखी पाऊस होतो आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून खाली पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी दारणा धरणातून ५ हजार क्युसेक्सने आणि गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी दारणा धरणातून ११६८८ आणि गंगापूर धरणातून ३६४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. या दोन्ही धरणांतून सुमारे पंधरा हजार क्युसेक्सने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात पाणी येत आहे. बुधवारी येणार जिवंत साठ्यात... कडाचे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले की, वरच्या भागातील धरणांमधून सोडलेले पाणी अद्याप नागमठाणपर्यंत पोहोचले नाही. तेथून ते जायकवाडीत पोहोचेल. मात्र, आता वरच्या भागातून सुमारे साडेअकरा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ते पाणी पोहोचल्यावर जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. सध्या जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. ते जिवंतसाठ्यात येण्यासाठी २० दलघमीची गरज आहे. वरचे पाणी दाखल झाल्यास बुधवारीच हे धरण जिवंतसाठ्यात येण्याची शक्यता आहे.