शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

शहराला डेंग्यूचा ‘डंख’

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ब्लड बँकांमध्ये प्लेटलेटस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. एवढे असूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहरच केला आहे. रुग्णांना घाटीसह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यश विनोद वरकड (५४, सादातनगर), सूरज श्याम बनकर (१२, सिद्धार्थनगर, हडको), परमेश्वर कड, मंगेश साळवे (२७, मयूर पार्क), नुसरत शेख (२०- एन-९), हेमंत बिस्वास (२३, न्यायनगर) यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाच वर्षीय माहिम सुलताना मीर असिफ अली या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला.डॉक्टरांनी काळजी घ्यावीशहरात प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉक्टरांनीही थोडीशी काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या रुग्णाचे प्लेटलेटस् १० हजारांपर्यंत येत नाहीत, तेव्हापर्यंत प्लेटलेटस् देण्याची घाई करू नये. अनेक डॉक्टर २० हजारांपर्यंत प्लेटलेटस् येताच मागणी करतात. काही रुग्णांचे प्लेटलेट झपाट्याने कमी होत असल्यास त्यांना त्वरित प्लेटलेटस् देणे गरजेचेही असते.डेंगीचा डासडेंगीचा एडिस इजिप्त हा डास घरातील स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे घरातील पाणी झाकून ठेवावे. घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या यात पाणी साठून तेथे या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. हा डास दिवसा चावत असल्याने हात आणि पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतरही ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.डेंग्यूमुळे लहान मुलांना बराच फटका बसत आहे. लहान मुलांची रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. डेंग्यूवर प्रभावी असे कोणतेच औषध आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर ताप कंट्रोलमध्ये आणणे, प्लेटलेटस् कमी जास्त होतात का एवढेच लक्ष ठेवून असतात. कारण डेंग्यूवर प्रभावी औषधी बाजारात उपलब्ध नसल्याचे डॉ. अभय जैन यांनी सांगितले.70 % नमुने पॉझिटिव्हशहरातील वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून ७० ते ८० टक्के नमुने पॉझिटिव्ह ठरत आहेत. शहरात बऱ्यापैकी डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डेंग्यूच्या चाचणीसाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.१) पौष्टिक आहार घ्यावा. २) फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ३) आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे. ४) शीतपेयांचे सेवन थांबवावे.५) फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. ६) सी जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.७) टोमॅटो, बोरं, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे. शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली. बैठकीत धूरफवारणी, औषधी फवारणी युद्धपातळीवर करा असे आदेश दिले. खाजगी डॉक्टरांच्या ‘आयएमए’ संघटनेने महापालिकेला डेंग्यू जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर गणेशोत्सवात करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरात ठिकठिकाणी शमशान परवाना देण्याची व्यवस्था करावी. घाटीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही बकोरिया यांनी बैठकीत दिले.