शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

शहराला डेंग्यूचा ‘डंख’

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ब्लड बँकांमध्ये प्लेटलेटस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. एवढे असूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहरच केला आहे. रुग्णांना घाटीसह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यश विनोद वरकड (५४, सादातनगर), सूरज श्याम बनकर (१२, सिद्धार्थनगर, हडको), परमेश्वर कड, मंगेश साळवे (२७, मयूर पार्क), नुसरत शेख (२०- एन-९), हेमंत बिस्वास (२३, न्यायनगर) यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाच वर्षीय माहिम सुलताना मीर असिफ अली या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला.डॉक्टरांनी काळजी घ्यावीशहरात प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉक्टरांनीही थोडीशी काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या रुग्णाचे प्लेटलेटस् १० हजारांपर्यंत येत नाहीत, तेव्हापर्यंत प्लेटलेटस् देण्याची घाई करू नये. अनेक डॉक्टर २० हजारांपर्यंत प्लेटलेटस् येताच मागणी करतात. काही रुग्णांचे प्लेटलेट झपाट्याने कमी होत असल्यास त्यांना त्वरित प्लेटलेटस् देणे गरजेचेही असते.डेंगीचा डासडेंगीचा एडिस इजिप्त हा डास घरातील स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे घरातील पाणी झाकून ठेवावे. घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या यात पाणी साठून तेथे या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. हा डास दिवसा चावत असल्याने हात आणि पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतरही ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.डेंग्यूमुळे लहान मुलांना बराच फटका बसत आहे. लहान मुलांची रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. डेंग्यूवर प्रभावी असे कोणतेच औषध आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर ताप कंट्रोलमध्ये आणणे, प्लेटलेटस् कमी जास्त होतात का एवढेच लक्ष ठेवून असतात. कारण डेंग्यूवर प्रभावी औषधी बाजारात उपलब्ध नसल्याचे डॉ. अभय जैन यांनी सांगितले.70 % नमुने पॉझिटिव्हशहरातील वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून ७० ते ८० टक्के नमुने पॉझिटिव्ह ठरत आहेत. शहरात बऱ्यापैकी डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डेंग्यूच्या चाचणीसाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.१) पौष्टिक आहार घ्यावा. २) फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ३) आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे. ४) शीतपेयांचे सेवन थांबवावे.५) फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. ६) सी जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.७) टोमॅटो, बोरं, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे. शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली. बैठकीत धूरफवारणी, औषधी फवारणी युद्धपातळीवर करा असे आदेश दिले. खाजगी डॉक्टरांच्या ‘आयएमए’ संघटनेने महापालिकेला डेंग्यू जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर गणेशोत्सवात करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरात ठिकठिकाणी शमशान परवाना देण्याची व्यवस्था करावी. घाटीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही बकोरिया यांनी बैठकीत दिले.