शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शहराला डेंग्यूचा ‘डंख’

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ब्लड बँकांमध्ये प्लेटलेटस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. एवढे असूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहरच केला आहे. रुग्णांना घाटीसह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यश विनोद वरकड (५४, सादातनगर), सूरज श्याम बनकर (१२, सिद्धार्थनगर, हडको), परमेश्वर कड, मंगेश साळवे (२७, मयूर पार्क), नुसरत शेख (२०- एन-९), हेमंत बिस्वास (२३, न्यायनगर) यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाच वर्षीय माहिम सुलताना मीर असिफ अली या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला.डॉक्टरांनी काळजी घ्यावीशहरात प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉक्टरांनीही थोडीशी काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या रुग्णाचे प्लेटलेटस् १० हजारांपर्यंत येत नाहीत, तेव्हापर्यंत प्लेटलेटस् देण्याची घाई करू नये. अनेक डॉक्टर २० हजारांपर्यंत प्लेटलेटस् येताच मागणी करतात. काही रुग्णांचे प्लेटलेट झपाट्याने कमी होत असल्यास त्यांना त्वरित प्लेटलेटस् देणे गरजेचेही असते.डेंगीचा डासडेंगीचा एडिस इजिप्त हा डास घरातील स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे घरातील पाणी झाकून ठेवावे. घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या यात पाणी साठून तेथे या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. हा डास दिवसा चावत असल्याने हात आणि पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतरही ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.डेंग्यूमुळे लहान मुलांना बराच फटका बसत आहे. लहान मुलांची रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. डेंग्यूवर प्रभावी असे कोणतेच औषध आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर ताप कंट्रोलमध्ये आणणे, प्लेटलेटस् कमी जास्त होतात का एवढेच लक्ष ठेवून असतात. कारण डेंग्यूवर प्रभावी औषधी बाजारात उपलब्ध नसल्याचे डॉ. अभय जैन यांनी सांगितले.70 % नमुने पॉझिटिव्हशहरातील वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून ७० ते ८० टक्के नमुने पॉझिटिव्ह ठरत आहेत. शहरात बऱ्यापैकी डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डेंग्यूच्या चाचणीसाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.१) पौष्टिक आहार घ्यावा. २) फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ३) आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे. ४) शीतपेयांचे सेवन थांबवावे.५) फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. ६) सी जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.७) टोमॅटो, बोरं, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे. शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली. बैठकीत धूरफवारणी, औषधी फवारणी युद्धपातळीवर करा असे आदेश दिले. खाजगी डॉक्टरांच्या ‘आयएमए’ संघटनेने महापालिकेला डेंग्यू जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर गणेशोत्सवात करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरात ठिकठिकाणी शमशान परवाना देण्याची व्यवस्था करावी. घाटीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही बकोरिया यांनी बैठकीत दिले.