शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

घाणेवाडी जलवाहिनी फुटली

By admin | Updated: May 21, 2014 00:18 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असतानाही अशा अडचणींमुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. इंदेवाडीनजीक जलवाहिनी फुटल्याने मध्यंतरी जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ मोठ्या प्रमाणात फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी गळती रोखण्यासाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पथकास तेथे पाठविले. जायकवाडी आणि घाणेवाडी या दोन्ही योजनांच्या जलवाहिन्या फोडण्याचे प्रमाण वाढत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक करूनही त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही. शहरात गेल्या वर्षभरात काही नवीन भागात जलवाहिनी अंथरण्यात आल्याने तेथे या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. (प्रतिनिधी) जलवाहिनी फोडणार्‍यांविरुद्ध पोलिस कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. मनोहरे म्हणाले की, यापूर्वीही जलवाहिनी फोडण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर पालिकेने अज्ञात नागरिकांविरुद्ध पोलिस कारवाई केलेली आहे. शहरातील नागरिकांनीही याबाबत नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मनोहरे यांनी केले आहे. गळती रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. जलवाहिनी फोडण्याचे प्रकार कायमस्वरूपी रोखण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. कारण जलवाहिनी फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. नगरपालिका प्रशासनाने जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेच्या संरक्षणासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जाते. कारण या योजनेसाठी दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल पालिकेला द्यावे लागते.