शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

घाणेवाडी जलवाहिनी फुटली

By admin | Updated: May 21, 2014 00:18 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असतानाही अशा अडचणींमुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. इंदेवाडीनजीक जलवाहिनी फुटल्याने मध्यंतरी जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ मोठ्या प्रमाणात फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी गळती रोखण्यासाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पथकास तेथे पाठविले. जायकवाडी आणि घाणेवाडी या दोन्ही योजनांच्या जलवाहिन्या फोडण्याचे प्रमाण वाढत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक करूनही त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही. शहरात गेल्या वर्षभरात काही नवीन भागात जलवाहिनी अंथरण्यात आल्याने तेथे या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. (प्रतिनिधी) जलवाहिनी फोडणार्‍यांविरुद्ध पोलिस कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. मनोहरे म्हणाले की, यापूर्वीही जलवाहिनी फोडण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर पालिकेने अज्ञात नागरिकांविरुद्ध पोलिस कारवाई केलेली आहे. शहरातील नागरिकांनीही याबाबत नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मनोहरे यांनी केले आहे. गळती रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. जलवाहिनी फोडण्याचे प्रकार कायमस्वरूपी रोखण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. कारण जलवाहिनी फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. नगरपालिका प्रशासनाने जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेच्या संरक्षणासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जाते. कारण या योजनेसाठी दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल पालिकेला द्यावे लागते.