शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

‘समृद्धी’च्या कामामुळे फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:33 IST

महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असल्याने परिसरातील फळबागा धोक्यात आल्या आहेत.

शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातून जात असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर चालू असून, या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ट्रकने मुरुम आणण्यात येत आहे. महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असल्याने परिसरातील फळबागा धोक्यात आल्या आहेत.

औरंगाबाद तालुक्यातील बेंदेवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी गितेश बाबूलाल शिहिरे व सतीश बाबूलाल शिहिरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गितेश शिहिरे व सतीश शिहिरे यांची बेंदेवाडी शिवारातील गट नंबर ७५ मध्ये १८०० डाळिंब पिकांची लागवड केलेली आहे.सदरील फळबाग आजरोजी फुलधारणेत आहे. समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू असून, यासाठी मुरुमाची वाहतूक ट्रकने करण्यात येत आहे. यामुळे मोठमोठ्या मशिनरी या रस्त्यावरुन जात असल्याने प्रचंड धूळ उडत आहे.

या धुळीमुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या असून, धुळीने डाळिंब फळाला डाग पडत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली आहे. परंतु अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गितेश शिहिरे म्हणाले की, यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फळबाग नियोजनासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आम्ही यावर्षी पाच लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु धुळीमुळे डाळिंब पिक धोक्यात आल्यामुळे कर्ज कसे भरावे असा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक