शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांमुळे गावे बनताहेत सावकारीमुक्त

By admin | Updated: June 10, 2014 00:18 IST

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव स्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली.

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेवस्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली. त्यापाठोपाठ स्थापन झालेल्या पुरूषांच्या शेतकरी बचत गटांनी आर्थिक बचत करतानांच कर्जपुरवठा केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव परिसरातील अनेक गावे सावकारीमुक्त होत आहेत.बँकाकडून वेळेवर आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. अस्मानी किंवा सुलतानी संकटामुळे पीक चांगले आले नाही, पिकाला बाजारात भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला कर्ज फेडणे अवघड जाते. त्यामुळे हाच शेतकरी हतबल होऊन आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो. यातून शेतकऱ्यांसाठी मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील काही पुरूष बचत गटांनी केला आहे. हिंगोली तालुक्यातील अनेक गावांत स्वर्णजयंती महिला बचतगट अभियानांतर्गत गटांची स्थापना झाली आहे. त्यातून शेकडो महिला एकत्रित आल्या. बचतीची चांगली सवय लागली. पाच वर्र्षांपूर्वी बचत गटाच्या कार्यास चांगली गती मिळाली. नर्सी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ६५ महिला बचत गटांचे खाते आहे. त्यामुळे महिन्याला जवळपास ४ लाखांची बचत करण्यात येते. त्यापैकी ९ महिला बचत गटांस २० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. त्यातून काही गटांनी शेळी पालन, फडे-टोपले तयार करणे, फळाचे दुकान, फोटो लॅमीनेशन करणे, दाराचे पडदे, ताट-झाकनाचे विणकाम, राखी बनविणे असे उद्योग केले आहेत. त्यातून गटांना चांगले उत्पन्नाचे साधन सापडले व बँकेचे कर्जही नियमित भरणा करीत राहिल्याने महिला सक्षम बनू लागल्या, असे बँकेचे शाखाधिकारी व्ही. एस. शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा ग्रामीण बँकेत ३५ गटांचे व्यवहार सुरू आहेत. त्यातून दरमहा ३ ते ४ लाखांचा व्यवहार होतो. १५ महिला बचत गटास या शाखेतून ३५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती शाखाधिकारी एस. पी. खंडेतोड यांनी दिली. महिलांना बचतीची चांगली सवय लागली आहे. महिला बँकेत येत असल्याने त्यांना कामाची माहिती होवू लागली. पूर्वी आषाढ महिना आला की, शेतकऱ्यांना पेरणीसाठी सावकारांचे दरवाजे झिजवावे लागत होते. त्यांच्या व्याजदरात शेतकरी पूर्णपणे नागविला जायचा; परंतु या बचत गटांच्या माध्यमातून व्यवहार होवून सावकारीस आळा बसला असल्याचे चित्र नर्सी परिसरात पहावयास मिळत आहे. या भागात शेतकऱ्यांनीही आपले गट तयार करून लाखो रूपयांची उलाढाल करीत १ टक्के व्याजदाराने कर्ज पुरवून आपला गाव सावकारीमुक्त केला आहे. सावकारी पाशाने आजवर हजारो शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील नर्सी परिसरातील शेतकरीही याला अपवाद नव्हते. दहा वर्षापुर्वी या गावांत मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी बोकाळली होती. या भागातील शेतकऱ्यांना कोणतीच बँक कर्ज देत नव्हती. विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज ठराविक शेतकऱ्यांनाच मिळायचे. अशावेळी सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सावकारांचाच आधार होता. पण स्वयंरोजगाराचे दालन खुले करून देणारा बचत गट अनेक गावांतील सर्वसामान्यांची आर्थिक नाडी बनला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून नाममात्र शुल्क आकारून त्याला गटाचे सभासद करून घेतले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे ५० हजारापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बचत गट शेतकऱ्यांना अडीनडीला, रात्री-अपरात्री पैसे उपलब्ध करून देतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना बँक व सावकारापेक्षा बचत गट अधिक फायदेशीर ठरत आहेत.