शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

औरंगाबाद जिल्ह्यात विहिरींना पडली कोरड, २२५ शाळांतील बोअरवेल आटले; पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:31 IST

जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असे असताना ५ हजारांहून अधिक विहिरी नव्याने खोदण्याची कामे सुरू असून, २२५ शाळांतील बोअरवेल पूर्णत: आटल्यामुळे त्या शाळांत पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बोअरवेल आटल्यामुळे शाळांतील प्रसाधनगृहांचा पाण्याअभावी वापर होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात मोठी कुचंबणा झाली. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्यात, त्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा असावी. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी वारंवार बैठक घेऊन पुनर्भरणाबाबत आदेशित केले असले तरी शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शाळांतील प्रसाधनगृह पाण्याअभावी बंद ठेवावे लागत आहेत. जानेवारीपर्यंत बोअरवेल्सना थोडेफार पाणी असते. त्यानंतर पुढील चार महिने त्या शाळांमध्ये पाणी नसल्यामुळे ती प्रसाधनगृहे वापरात येत नाहीत. दुसरीकडे दीड लाखांपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होत आहे. जमिनीखालच्या पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरीचे व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले, जिल्ह्यातील २२५ शाळांमधील बोअरवेल आटल्यामुळे तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शाळांची वारंवार बैठक घेऊन त्यांना बोअरवेल पुनर्भरणाच्या सूचना दिलेल्या आहेत. तशीच बाब विहिरींच्या बाबतीत आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान विहीर पुनर्भरणासाठी आहे. पुनर्भरणासाठी मे महिन्यातच कार्यवाही केली तर मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढून अनेक शेतकºयांना त्याचा फायदा होईल. दीड लाख विहिरींपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तेथे हा प्रयोग होणे महत्त्वाचे आहे.