शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात विहिरींना पडली कोरड, २२५ शाळांतील बोअरवेल आटले; पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:31 IST

जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असे असताना ५ हजारांहून अधिक विहिरी नव्याने खोदण्याची कामे सुरू असून, २२५ शाळांतील बोअरवेल पूर्णत: आटल्यामुळे त्या शाळांत पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बोअरवेल आटल्यामुळे शाळांतील प्रसाधनगृहांचा पाण्याअभावी वापर होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात मोठी कुचंबणा झाली. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्यात, त्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा असावी. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी वारंवार बैठक घेऊन पुनर्भरणाबाबत आदेशित केले असले तरी शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शाळांतील प्रसाधनगृह पाण्याअभावी बंद ठेवावे लागत आहेत. जानेवारीपर्यंत बोअरवेल्सना थोडेफार पाणी असते. त्यानंतर पुढील चार महिने त्या शाळांमध्ये पाणी नसल्यामुळे ती प्रसाधनगृहे वापरात येत नाहीत. दुसरीकडे दीड लाखांपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होत आहे. जमिनीखालच्या पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरीचे व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले, जिल्ह्यातील २२५ शाळांमधील बोअरवेल आटल्यामुळे तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शाळांची वारंवार बैठक घेऊन त्यांना बोअरवेल पुनर्भरणाच्या सूचना दिलेल्या आहेत. तशीच बाब विहिरींच्या बाबतीत आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान विहीर पुनर्भरणासाठी आहे. पुनर्भरणासाठी मे महिन्यातच कार्यवाही केली तर मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढून अनेक शेतकºयांना त्याचा फायदा होईल. दीड लाख विहिरींपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तेथे हा प्रयोग होणे महत्त्वाचे आहे.