शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शिवसेनेत उभी फुट पडली, दिग्गज गेले; दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे डोहाळे

By बापू सोळुंके | Updated: August 20, 2022 18:37 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटात जिल्ह्यातील पाच आमदारांसोबत त्यांचे समर्थक पदाधिकारीही गेले आहेत. यामुळे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाच आमदार बाहेर पडल्याने त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत.

शिंदे गटासोबत कोण कोण गेले?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत. या आमदारांचे समर्थक असलेले पक्षातील विविध पदाधिकारीही त्यांच्यासोबत गेले आहेत. यात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, माजी उपमहापौर तथा युवासेना राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ, कन्नड तालुकाप्रमुख केतन काजे, सिल्लोड तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, पैठण तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपजिल्हाप्रमुख विनोद बाेंबले, वैजापूर उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, शहराध्यक्ष राजेंद्र साळुंके.

उद्धव यांच्यासोबत कोण राहिले?शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशनचंद तणवाणी, शहर संघटक राजू वैद्य, ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात. माजी महापौर नंदू घोडेले.

विधानसभेला चित्र आणखी बदलणार२०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युती करून लढविली होती. मागील निवडणुकीत शिवसेनेने सहा तर भाजपचे तीन आमदार विजयी होत जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. सेनेच्या सहापैकी पाच आमदार शिंदे गटात गेले. त्यांच्यासोबत समर्थकांनीही त्यांना पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघापैकीत पैठण, सिल्लोड येथे शिवसेनेकडे ताकदवान उमेदवारच नसल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना कितव्या स्थानावर? विधानसभा             कितवा क्रमांकपैठण- पहिल्या क्रमांकावरवैजापूर- पहिल्या क्रमांककन्नड- पहिला क्रमांकसिल्लोड- पहिला क्रमांकऔरंगाबाद-मध्य- पहिला क्रमांकऔरंगाबाद पश्चिम- पहिला क्रमांकफुलंब्री-भाजपऔरंगाबाद पूर्व-भाजपगंगापूर- भाजप

शिंदे गटाचे वर्चस्व असेलआगामी निवडणुका या भाजपसोबत युती करूनच लढल्या जातील, असे संकेत वरिष्ठांकडून मिळालेले आहेत. जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार आमच्यासोबत आहेत. शिवाय सेनेसह विविध पक्षातील नेतेही शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचेच वर्चस्व असेल.- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख शिंदेगट, शिवसेना.

शिवसेना दोन जागा अधिक जिंकेलजिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार विजयी झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत या पाच जागांवर आमचे उमेदवार निवडून येतीलच, शिवाय गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघही आम्ही जिंकू. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड असेल.- आ. अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवे