शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे बेहाल

By admin | Updated: December 18, 2015 23:29 IST

हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले.

हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले. मागण्या मान्य केल्याने संप मागे घेतल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळताच फटाके फोडून जल्लोष साजरा केला. परिवहनमधील चालक, वाहक, प्रशासक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांनी बसस्थानकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मात्र ज्या प्रवाशांना बाहेरगावी जाणे गरजेचे होते त्यांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला. हिंगोली आगारातून विविध मार्गे नियमित ५९ गाड्या २१ हजार ९९५ किमी जातात. त्यापासून आगाराला दिवसाकाठी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु उत्पन्न तर सोडाच साधी विद्यार्थ्यांची गैरसोयदेखील टाळणे शक्य झाले नाही. आज विद्यार्थी खाजगी वाहनाने शाळेत येताना दिसत होते. हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या एकूण पाच बसेस धावतात. यामध्ये पुणेमार्गे २, हैदराबाद १, सोलापूर १, मुंबई १ या बसेसचा समावेश आहे. त्या न धावल्याने २५० प्रवाशांची तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशीच्या संपात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली होती. यात ३५० कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोलीतील एकूण सात संघटना सहभागी झाल्या होत्या. वसमतमध्ये हाल वसमत: एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. संप मिटल्याची घोषणा झाल्यानंतर ४ वाजल्यापासून बच धावण्यास सुरूवात झाली. येथून दररोज ५९ बस धावतात. दररोज उत्पन्न ५ ते साडेपाच लाख आहे. मात्र ते सतत दोन दिवस बुडाले.