शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून,

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्यापही बैलांसाठी लागणारे साज, सुताच्या दोरीची खरेदी झालेली नाही. त्यामुळे पोळा कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे.नळणी व परिसरात भर पावसाळ्यात आलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, मिरची लागवड केली. परंतु त्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यातही उत्पादनाची घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊसच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच शेतकऱ्याचां मोठा सण म्हणून पोळ्याला महत्त्व आहे. त्यामळे बैलांसाठी शहरात जावून घागरमाळ, बाशिंग, झाल आणतात परंतु यंदा सुताचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोळा सण हा आठ दिवसांवर आला आहे. तरी बाजारपेठेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच पोळा सणावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोळासणासाइी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूत थोडीफार वाढ झालेली आहे. मात्र आधिच दुष्काळ असल्याने शेतकरी फारसे साहित्य खरेदी करताना दिसून येत नाही.पावसाची प्रतीक्षाचजालना जिल्ह्यातमागील तीन वर्षापासून निर्सगाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे.जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला होता. १२ आॅगस्टअखेर वार्षिक टक्केवारीच्या ७३. ३३ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी मात्र आज पर्यंत केवळ १७.५९ टक्के पाऊस झालेला आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा चार पटीने कमी पाऊस झालेला आहे. जिल्हा भरातील शेतकरी अद्यापही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)