शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसायावर परिणाम

By admin | Updated: May 26, 2014 00:56 IST

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे.

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी हिंगोली शहरातील जनावरांच्या बाजारात कवडीमोल दरात शेतकरी जनावरे विकत आहेत. दुसरीकडे शेकडा दीड हजार रूपये मोजून कडबा विकत घेवून टाकणे शक्य नसल्याने दुग्ध व्यवसायावर चाराटंचाईचा परिणाम झाला आहे. कृषिप्रधान देशात जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत. प्रतिवर्षी हमखास येणार्‍या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही उत्पादकांना कडब्याचा शोध घ्यावा लागत आहे; परंतु सर्वत्रच चाराटंचाई निर्माण झाल्याने उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातही चारा मिळत नसल्याने जनावरे विकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यातही बाजारात घेवाल नसल्याने जनावरे कवडीमोल दरात विकली जात आहेत. औताव्यतिरिक्त असलेली जनावरे उत्पादकांनी विक्रीस काढली आहेत. पावसाळा जरी तोंडावर आला असला तरी आतापासून चार महिन्यापर्यंत जनावरांना चारा टाकावा लागतो. जोपर्यंत नवीन चारा निर्माण होणार नाही, तोपर्यंत उत्पादकांना चारा विकत घ्यावा लागणार आहे. खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी तडजोड केली असताना कडबा विकत घेवून टाकणे शक्य होणार नाही. त्यामुळे औताव्यतिरिक्त जनावरे विकून शेतकरी मोकळा झाला आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. दुधावर जीवनमान अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दुधाचे पैसे चारा विकत घेण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. अद्याप मान्सूनचा पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो. दुधाळ जनावरांना हिरवा चारा टाकावा लागतो. कडबाच मिळणे दुर्मिळ झाले असताना हिरव्या चार्‍याची गोष्ट लांबचीच आहे. त्यामुळे हिंगोलीत दुग्धव्यवसायिकांची संख्या घटली आहे. आहे त्या व्यावसायिकांनी दूध देणारी जनावरे ठेवली असून उर्वरित जनावरे विकून टाकली आहेत. (प्रतिनिधी)हिंगोली शहरात दूधविक्रेत्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच राहिली आहे. प्रतिवर्षीच्या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय मोडीत काढल्याने हॉटेल्सला तसेच घरोघरी जावून दूध विकणार्‍यांकडून २ हजार लिटरचा पुरवठा होतो; पण शहरात प्रत्येक दिवशी २० हजार लिटरची आवश्यकता पॅकेटच्या दुधावर भागविली जाते. त्यातही शहरात येणारे सर्व पॅकेटचे दूध पश्चिम महाराष्ट्रातील आहे पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली असून उत्पादकांना घ्यावा लागत आहे कडब्याचा शोध दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत