शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

प्रदेशाध्यक्षपद गेल्याने दानवे समर्थकांचे चेहरे उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 13:27 IST

आता राजूरच्या गणपतीऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन 

ठळक मुद्देउमेदवारी मिळण्याबाबत संकट महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले

- विकास राऊत 

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लावत भाजपने त्यांच्याकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी काढून घेतली. महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ती जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पद गेल्यामुळे दानवे समर्थकांचे चेहरे उतरले आहेत. आता समर्थकांनी नूतन प्रदेशाध्यक्षांशी जवळीक असणाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील भाजपचे काही पदाधिकारी कोल्हापूरच्या नेटवर्कमध्ये आहेत, त्यांच्याशी जवळीक साधून विधानसभा व इतर पद पदरात पाडून घेण्याचा विचार काहींच्या डोक्यात घोळू लागला आहे. यापुढे राजूरच्या गणपती ऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाजप पदाधिकारी आवूर्जन जातील.

२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री पद काढून घेत दानवे यांना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली. सुमारे पाच वर्ष ते पदावर राहिल्यामुळे त्यांची पक्ष संघटनेत चांगलीच ‘घडी’ बसली होती. २०१५ च्या मनपा निवडणुकीपासून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातून जे कुणी पक्षात आले, त्यांना राज्यमंत्री दानवे यांनी विधानसभा उमेदवारीसह इतर पदांवर बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. त्या सर्व इच्छुकांचे अवसान मंगळवारपासून गळाले आहे. संघटन सत्तेचे केंद्र मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात सरकल्यामुळे संघटनेतील ‘दादागिरी’ आता संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. फु लंब्री आणि पूर्व मतदारसंघातील इच्छुकांना आता पळता भूई थोडी होणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एक गट दानवे यांच्यासाठीच सक्रीय असायचा. प्रदेशाध्यक्ष संघाच्या मुशीतील असल्यामुळे त्या गटाच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत संघटन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगलेएका पक्षातून उडी मारून भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्री दानवे यांच्या मागे-पुढे करणाऱ्याला एका आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. गेल्या आठवड्यात सदरील इच्छुकाने राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत मुंबईवारी करून पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पदरी निराशा आल्यामुळे सगळा विषय ठप्प झाला. परंतु लायझनिंग करण्यात काही आयाराम (इतर पक्षातून आलेले) तरबेज आहेत. ते आता चतुर्थीच्या दिवशी राजूरच्या गणपतीच्या दर्शनाला जाण्याऐवजी दर पोर्णिमेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण