शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे नळ योजना रखडली

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ

पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे आणि सरपंचांच्या दुर्लक्षामुळे ही योजना अद्यापही रखडलेलीच आहे. ग्रामस्थांनीही या योजनेबाबत साधी विचारपूसही केलेली नाही. या नळ योजनेत पाणीपुरवठा समितीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंपरखेड ग्रामस्थांनी केला आहे.२००७ साली ३६ लाख रुपये खर्चाची पिंपरखेडला नळ योजना मंजूर झाली. या योजनेअंतर्गत माजलगावच्या सिंदफणा धरणावरून गावाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. त्या प्रमाणे माजलगाव धरणातून पाईपलाईन करून गावामध्ये पाणीही आणले. विहिरीचे कामही पूर्ण झाले. मात्र ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे अद्यापही गावात टाकीचे बांधकाम झालेले नाही. लाखो रुपयांची जलस्वराज्य योजना स्वत:च्या खिशात घालण्याचे काम येथील पाणीपुरवठा समिती करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.सरपंच अशोक निपटे यांना विचारले असता आचारसंहिता संपताच काम पूर्ण करू असे म्हणत हात झटकले. वास्तविक पाहता तत्कालिन सरपंचाने ही नळ योजना पूर्ण केली नाही याची साधी चौकशी करण्याची तसदीही सरपंच निपटे यांनी घेतली नाही.त्यामुळे येथील पाणीपुरवठा विभागाशी सरपंचासह गावातील काही लोकांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. ग्रामस्थही या नळ योजनेबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. या नळ योजनेबाबत केवळ पंचायत समितीला तक्रार देण्यात आली होती. मात्र यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सचिव भागवत निपटे म्हणाले, या योजनेचे दोन हप्ते अद्याप बाकी आहेत. ते पैसे आल्यास राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. या पाणीपुरवठा विभागाला मागील पाच वर्षापासून अद्यापर्यंत या योजनेचे पैसे मिळालेच नाहीत का? याबाबत संशय व्यक्त होत आहे. माजलगाव धरणावर पाणीपुरवठ्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये मोटारही बसविण्यात आली आहे. पाईपलाईनद्वारे गावापर्यंत पाणीही आलेले आहे. गावात पाणी येऊनही ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे टाकीचे बांधकाम रखडलेलेच आहे. तसेच नळ कनेक्शनही जोडलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कोसो मैल दूर भटकंती करावी लागत आहे. गटविकास अधिकारी बी.डी. राऊत म्हणाले, हे काम खूप वर्षांपूर्वीचे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. नळ योजना सुरू करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)