शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडत नसल्याने रोपे सुकू लागली

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत.

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अगोदर गारपीट त्यानंतर दुबार पेरणी आणि आता पावसाचा ताण यामुळे हे वर्ष खडतर असल्याची चर्चा शेतकरीवर्गातून होत आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात आजतागायत २३ हजार ८४९ हेक्टर्सवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ अद्यापि, ७ टक्के शेतकरी संभ्रमात असून, संथ गतीने पेरणी होत असल्याचे चित्र आहे़ परंतु, पंधरा दिवसांपूर्वीच्या अल्प पर्जन्यावर पेरणी उरकली गेली. पावसाने आठ दिवसांपासून दडी मारल्याने कोवळी पिके दुपार धरत आहेत़ उन्हाचा तडाखा त्यांना सहन होत नाही. मागील काही दिवसांपासून जोरदार वारे सुटल्याने जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस घटत आहे़ मध्येच काळेभोर ढग येतात. आता क्षणात जोरदार पर्जन्यमान होईल, असे वाटते़ परंतु, पाऊस काही येत नाही़ आजतागायत तालुक्यात केवळ २१५ मि़मी़ सरासरी पाऊस झाला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन साल खडतर असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे़(वार्ताहर)दिवसा ढग रात्री चांदणे़़़दिवसभर काळे ढग आणि रात्री टिपूर चांदणे असेच चित्र गेली आठ दिवसापासून दिसत आहे़ त्यामुळे काही शेतकरी तुषार संचाद्वारे पाणी देऊन दुपार धरणारी कोवळी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या जीवनवाहिन्या असलेल्या घरणी, मांजरा या नद्यांची पात्रे कोरडीठाक असून, अद्यापि, एक वेळाही या नद्यांना पूर आला नाही़ त्यामुळे जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़