शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

पाऊस पडत नसल्याने रोपे सुकू लागली

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत.

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अगोदर गारपीट त्यानंतर दुबार पेरणी आणि आता पावसाचा ताण यामुळे हे वर्ष खडतर असल्याची चर्चा शेतकरीवर्गातून होत आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात आजतागायत २३ हजार ८४९ हेक्टर्सवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ अद्यापि, ७ टक्के शेतकरी संभ्रमात असून, संथ गतीने पेरणी होत असल्याचे चित्र आहे़ परंतु, पंधरा दिवसांपूर्वीच्या अल्प पर्जन्यावर पेरणी उरकली गेली. पावसाने आठ दिवसांपासून दडी मारल्याने कोवळी पिके दुपार धरत आहेत़ उन्हाचा तडाखा त्यांना सहन होत नाही. मागील काही दिवसांपासून जोरदार वारे सुटल्याने जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस घटत आहे़ मध्येच काळेभोर ढग येतात. आता क्षणात जोरदार पर्जन्यमान होईल, असे वाटते़ परंतु, पाऊस काही येत नाही़ आजतागायत तालुक्यात केवळ २१५ मि़मी़ सरासरी पाऊस झाला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन साल खडतर असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे़(वार्ताहर)दिवसा ढग रात्री चांदणे़़़दिवसभर काळे ढग आणि रात्री टिपूर चांदणे असेच चित्र गेली आठ दिवसापासून दिसत आहे़ त्यामुळे काही शेतकरी तुषार संचाद्वारे पाणी देऊन दुपार धरणारी कोवळी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या जीवनवाहिन्या असलेल्या घरणी, मांजरा या नद्यांची पात्रे कोरडीठाक असून, अद्यापि, एक वेळाही या नद्यांना पूर आला नाही़ त्यामुळे जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़