शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समायोजनाच्या नव्या धोरणामुळे आंतरजिल्हा बदलीग्रस्तांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 12:28 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लागला असे वाटत असतानाच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या समायोजनाच्या नवीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षक संघटनांनी केली आहे.

ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना फटका

गजानन दिवाणऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लागला असे वाटत असतानाच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या समायोजनाच्या नवीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षक संघटनांनी केली आहे.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न ‘लोकमत’ने मालिकेद्वारे लावून धरला. शिक्षक सहकार संघटनेने राज्यस्तरावर आंदोलन उभारले. त्याची दखल घेऊन शासनाने १४ मार्च २०१७ रोजी आंतरजिल्हा बदलीचे नवीन आॅनलाइन धोरण जाहीर केले. त्यानुसार १२ जून रोजी आॅनलाइन आंतरजिल्हा बदल्यांच्या याद्या जिल्हावार प्रसिद्ध करून ५५०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या एका क्लीकवर करून टाकल्या.

राज्यात अजूनही तब्बल १६००० शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत असताना शासनाने ४ आॅक्टोबर रोजी हा नवीन आदेश आणला. यानुसार खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रिक्त असलेल्या जागांवर आंतरजिल्हा बदलीने येणा-या शिक्षकांना स्थान मिळणार नसून ती जागा खासगी शाळेचे शिक्षक घेणार आहेत.

१५ ते २० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या तब्बल १६००० शिक्षकांवर हा मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या निर्णयामुळे संस्थाचालकांनी डोनेशन घेऊन भरलेल्या लोकांना जिल्हा परिषदेत आणून सोडण्याचे दार मोकळे झाले आहे, असा आरोप पिट्टलवाड यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.

यापूर्वी शासनाने संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झालीच नाही. राज्यात संस्थेतील शिक्षकांचे समायोजन संस्थाचालक  स्वत: करून घेत नसतील तर जि.प.तील अतिरिक्त शिक्षक करून घेतील का, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र दूर समायोजन केल्यास कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे त्याचा अध्यापनावर परिणाम होत असल्याचे नवीन आदेशाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. मात्र त्यांचा विचार करीत असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांवर मात्र अन्याय झाल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

या शिक्षकांना घराच्या जवळ येण्याची आशा अलीकडच्या निर्णयामुळे निर्माण झाली असतानाच हे नवीन धोरण जाहीर करून आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम सरकारने केले असल्याचा आरोप पिट्टलवाड यांनी केला.

संस्थाचालकांवर मेहरबानी कशासाठी?संस्थेत भरती करायची, शिक्षक अतिरिक्त करायचे आणि अतिरिक्त झालेले शिक्षक जिल्हा परिषदेत आणून सोडायचे, असे उद्योग अनेक संस्थाचालकांनी यापूर्वी केले आहेत. संस्थेतून जिल्हा परिषदेत समायोजन केलेल्या शिक्षकाला पाच वर्षांपर्यंत त्या संस्थेत जागा रिक्त झाली तर परत पाठविण्याचा नियम होता. या नियमानुसार आजपर्यंत एकाही शिक्षकाला कुठल्याही संस्थेने परत घेतले नाही. अशा संस्थाचालकांसाठी आंतरजिल्हा बदलीग्रस्तांवर अन्याय कशासाठी, असा सवाल पिट्टलवाड यांनी केला. या प्रश्नी न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.