शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीच नसल्याने शस्त्रक्रियाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:25 IST

येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी ठोस उपयोजना होत नसल्याने पाण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना भटकंती करत पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. तर शस्त्रक्रियाही बंद झाल्या आहेत.हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालय नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहते. तसे या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होऊ दिली जात नसली तरीही पाणी प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. त्यातच अधून- मधून पाण्याच्या जबाबदारी एकमेकावर ढकलल्या जात असल्याने, यामध्ये मरण होत आहे ते येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे व नातेवाईकांचे. एवढेच काय तर येथे कार्य बजावणाºया डॉक्टरांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गंभीर प्रश्न म्हणजे रुग्णांना येथे आज घडिला पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे रुग्ण परिसरात पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करुन हॉटेलवर जावून पाणी पित आहेत. तेथेही काही घेतलेच तर पाणी दिले जात असल्याचे रुग्ण सांगत होते. अशा भयंकर परिस्थितीत मात्र ‘बॉटल’ च्या पाण्याला मोठी मागणी वाढली आहे. मागील २० ते २२ दिवसांपासून या ठिकाणी पाणीच नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत होते. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले रुग्ण पाण्यासाठी नातेवाईकाडे धाव घेत असल्याचे विदारक चित्र गुरुवारी दिसून आले. याठिकाणी असलेले वाटॅर कुलर नेहमीच बंद असल्याचेही रुग्ण सांगत होते.त्यातच दोन दिवसांपासून रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारीच पाईपलाईन फुटल्याने पाणी बंद झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्वच स्वच्छता गृहाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर पाणीच नसल्यामुळे साफाईसाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी येत आहे. तसेच वार्डातील पंखे व लाईटचीही समस्याही सुटलेली नसल्याने रुग्णांना डासांचा व अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे रुग्ण सांगत होते. तसेच पाणीच नसल्याने या ठिकाणी मागील आठ दिवसांपासून शस्त्रक्रियादेखील बंद झाल्या आहेत. त्यामुळे येथून रुग्ण रेफरचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्हासामान्य रुग्णालयात मागील १० ते १५ दिवसांपासून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र येथील स्थिती पाहिल्यानंतर बहुतांश रुग्ण तर एक ते दोन दिवस उपचार घेत असून, पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या टाक्याही कोरड्या ठण पडल्याने जेवनानंतर हात धुण्यासही येथे पाणी नाही. त्यामुळे पिण्यासह धुण्यासाठी बॉटलच्याच पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.