शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पाणीच नसल्याने शस्त्रक्रियाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:25 IST

येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी ठोस उपयोजना होत नसल्याने पाण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना भटकंती करत पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. तर शस्त्रक्रियाही बंद झाल्या आहेत.हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालय नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहते. तसे या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होऊ दिली जात नसली तरीही पाणी प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. त्यातच अधून- मधून पाण्याच्या जबाबदारी एकमेकावर ढकलल्या जात असल्याने, यामध्ये मरण होत आहे ते येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे व नातेवाईकांचे. एवढेच काय तर येथे कार्य बजावणाºया डॉक्टरांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गंभीर प्रश्न म्हणजे रुग्णांना येथे आज घडिला पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे रुग्ण परिसरात पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करुन हॉटेलवर जावून पाणी पित आहेत. तेथेही काही घेतलेच तर पाणी दिले जात असल्याचे रुग्ण सांगत होते. अशा भयंकर परिस्थितीत मात्र ‘बॉटल’ च्या पाण्याला मोठी मागणी वाढली आहे. मागील २० ते २२ दिवसांपासून या ठिकाणी पाणीच नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत होते. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले रुग्ण पाण्यासाठी नातेवाईकाडे धाव घेत असल्याचे विदारक चित्र गुरुवारी दिसून आले. याठिकाणी असलेले वाटॅर कुलर नेहमीच बंद असल्याचेही रुग्ण सांगत होते.त्यातच दोन दिवसांपासून रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारीच पाईपलाईन फुटल्याने पाणी बंद झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्वच स्वच्छता गृहाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर पाणीच नसल्यामुळे साफाईसाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी येत आहे. तसेच वार्डातील पंखे व लाईटचीही समस्याही सुटलेली नसल्याने रुग्णांना डासांचा व अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे रुग्ण सांगत होते. तसेच पाणीच नसल्याने या ठिकाणी मागील आठ दिवसांपासून शस्त्रक्रियादेखील बंद झाल्या आहेत. त्यामुळे येथून रुग्ण रेफरचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्हासामान्य रुग्णालयात मागील १० ते १५ दिवसांपासून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र येथील स्थिती पाहिल्यानंतर बहुतांश रुग्ण तर एक ते दोन दिवस उपचार घेत असून, पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या टाक्याही कोरड्या ठण पडल्याने जेवनानंतर हात धुण्यासही येथे पाणी नाही. त्यामुळे पिण्यासह धुण्यासाठी बॉटलच्याच पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.