शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

स्थानिक प्रकल्पातील पाणी संकलन घटले

By admin | Updated: April 25, 2016 23:33 IST

लातूर : रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी येत असल्याने स्थानिक स्त्रोतातून होणारे संकलन कमी झाले आहे़ रेल्वेच्या १० वॅगन येत असताना

लातूर : रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी येत असल्याने स्थानिक स्त्रोतातून होणारे संकलन कमी झाले आहे़ रेल्वेच्या १० वॅगन येत असताना ५५ ते ६० लाख लिटर पाणी संकलित केले जात होते़ आता ५० वॅगन सुरु झाल्यानंतर ३३ लाख लिटर पर्यंतच स्थानिक स्त्रोतातून पाणी उचलले जात आहे़ दरम्यान, रेल्वेचे पाणी मिळत असल्यामुळे नव्हे तर स्थानिक स्त्रोतातील पाणी कमी झाल्यामुळे संकलन कमी झाले असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले़रेल्वेच्या १० वॅगन सुरु असताना डोंगरगाव, साई, धनेगाव, निम्न तेरणा, भंडारवाडी येथून पाणी उचलले जात होते़ या सर्व स्त्रोतातून ५५ ते ६० लाख लिटर दररोज पाणी संकलित केले जात होते़ मात्र गेल्या काही दिवसांपासून भंडारवाडी, धनेगाव येथील प्रकल्पातील पाणी उचलणे बंद झाले आहे़ साई ट्रेंस येथूनही एक दिवसाआड पाणी उचलले जात आहे़ सोमवारी डोंगरगाव येथील प्रकल्पातून १२ टँकरद्वारे ३ लाख लिटर पाणी उचलण्यात आले़ तर माळकोंडजी येथे १११ टँकरद्वारे २७ लाख ७५ हजार लिटर तर साई ट्रेंच येथून ३ लाख लिटर पाणी उचलण्यात आले आहे़ जवळपास ३३ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले़ रेल्वेचे वगळून ३३ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले आहे़ ८ दिवसांपूर्वी रेल्वेच्या १० वॅगन येत असताना ५५ ते ६० लाख लिटर पाणी दररोज संकलित केले जात होते़ आता मात्र ३३ लाख लिटर पाणी स्थानिक स्त्रोतातून संकलित केले जात आहे़ डोंगरगाव आणि भंडारवाडीतून १२ लाख लिटरच्या पुढे पाणी घेण्यात येत होते़ परंतू भंडारवाडी प्रकल्पातून पाणी उचलणे बंद झाले असून, डोंगरगावमधूनही कमी प्रमाणात पाणी उचलले जात आहे़ स्थानिक स्त्रोतातील मोठा स्त्रोत आता निम्न तेरणा माळकोंडजी पॉर्इंट असून, या पॉर्इंटवरून दररोज २५ लाख लिटरच्या पुढे पाणी घेण्यात येत आहे़ मंगळवारी माळकोंडजी पॉर्इंटवरून २५ हजार लिटरच्या १११ टँकर फेऱ्या करून २७ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले़