शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीअभावी अनेक कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:21 IST

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीअभावी अनेक कामांचा खोळंबा होतो आहे. पीक कर्ज, पीक विमा, खरीप-रबी हंगामाच्या अडचणी, दुष्काळामुळे ...

ठळक मुद्देबैठकीची तारीख पे तारीख : २ फेबु्रवारीला बैठक होणार असल्याची माहिती

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीअभावी अनेक कामांचा खोळंबा होतो आहे. पीक कर्ज, पीक विमा, खरीप-रबी हंगामाच्या अडचणी, दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्ण जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत असल्यामुळे टंचाई, चारा छावण्या, पाणीपुरवठा योजना, धरण क्षेत्रातील वीजपंप वीजपुरवठा यासारख्या अनेक ग्रामोपयोगी निर्णयांना गती मिळत नसल्याची ओरड आहे. चार वर्षांत तीन वेळा पालकमंत्री बदलण्यात आल्यामुळे डीपीसीच्या बैठका नावापुरत्याच राहिल्या. गेल्या वर्षभरातही पालकमंत्र्यांना जसा वेळ मिळेल, त्यानुसार बैठकी झाल्या. तीच परंपरा सध्या कायम आहे. १४ आणि २९ जानेवारी रोजी डीपीसीची बैठक होणार होती. आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वा. डीपीसीची बैठक होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.१८ जानेवारी रोजी राज्य नियोजनाच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीला औरंगाबादचे पालकमंत्री नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेच वाढीव निधीची मागणी केली. प्रशासनाला आचारसंहितेपूर्वी वेगाने कामे उरकावी लागणार असल्यामुळे डीपीसीची बैठक वेळेत होणे गरजेचे होते.पाणीपुरवठा योजनाजिल्ह्यातील ११ लाख नागरिकांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४५० गावे आणि १७० वाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे. किती नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली. किती योजना पूर्ण झाल्या, याची कुठलीही माहिती समोर येत नाही, तसेच बहुतांश जलप्रकल्पांत पाणी नसल्यामुळे अनेक योजना अवसायनात आहेत. धरण क्षेत्रातील कृषी पंपांना ६ तास वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.कर्जमाफीअभावी हालशिवसेना शेतकºयांची कर्जमाफी ही फसवी असल्याची ओरड करीत आहे. जिल्ह्यात ६ लाख शेतकरी असून, किती १४ ग्रीनलिस्ट कर्जमाफीच्या जाहीर झाल्या आहेत. किती शेतकºयांना गावनिहाय कर्जमाफी मिळाली, याची माहिती बँका समोर आणत नाहीत. जिल्हा प्रशासनाने बँकांना याबाबत सूचना देण्याची मागणी होत आहे.चाराटंचाई, स्थलांतर, रोजगारजिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ लहान-मोठी जनावरे आहेत. या जनावरांसाठी चारा छावण्यांचे काय नियोजन आहे. रोजगार, चारा व पाण्यासाठी जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूरमधील नागरिकांचे स्थलांतर होत असल्याची चर्चा आहे. ६०० ग्रामपंचायतींतर्गत हमी योजनांची कामे सुरू नसल्याचे मागच्या बैठकीत चर्चेला आले होते. यावर काय उपाययोजना केल्या, हे समोर येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :District Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबादShiv Senaशिवसेना