शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुख्याधिकाऱ्याअभावी पालिकेचा कारभार विस्कळीत

By admin | Updated: August 28, 2014 01:39 IST

नळदुर्ग : येथील नगर परिषदेला गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात नियमितपणे साफसफाई होत नसून,

नळदुर्ग : येथील नगर परिषदेला गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात नियमितपणे साफसफाई होत नसून, यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.येथील पालिकेत त्रिंबक ढेंगळे-पाटील हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. १ एप्रिल २०१४ रोजी त्यांची बदली झाली. तेव्हापासून आजतागायत हे पद रिक्त आहे. प्रारंभी तुळजापूरचे नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे येथील मुख्याधिकाऱ्यांच्या अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यानंतर आता हा पदभार तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांच्याकडे आहे. परंतु, त्यांना तुळजापुरातील कामे पाहून इकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या पालिकेतील अनेक कामांचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.मुख्याधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांवरही कुणाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी वाट पहावी लागत आहे. शिवाय शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामेही विस्कळीत झाली आहेत. शहरातील बौध्द नगर, रहीम नगर, वडार वाडी, इंदिरा नगर, व्यास नगर, रामलिला नगर, वसंत नगर भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तसेच साफसफाई कर्मचारी नियमित येत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. शहरात अनधिकृत नळधारकांचीही संख्या वाढली असून, कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेत साफसफाई कर्मचाऱ्यांसह ५४ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, मुख्याधिकारीच नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसते. शहराच्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा उपद्रवही वाढला असून, शहरवासियांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करून पालिकेचा विस्कळीत झालेला कारभार सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान, याबाबत उपनगराध्यक्षा सुप्रिया पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता कायम मुख्याधिकारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच याबाबत सभागृहातही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)